ETV Bharat / city

..त्यामुळे भाजप अन् अंबानी यांचे हे षड्यंत्र आहे का, नाना पटोले यांचा सवाल

author img

By

Published : Mar 10, 2021, 3:29 PM IST

Updated : Mar 10, 2021, 4:00 PM IST

देशात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात मुकेश अंबानी यांची छबी खराब झाली आहे. तसेच अंबानी यांचे शेअर बाजारात लाखो कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. अंबानी यांना सहानुभूती मिळावी, यासाठी तर भाजपचा खटाटोप नाही ना? अशी शंका नाना पटोले यांनी माध्यमांच्या समोर उपस्थित केली.

Nana Patole criticizes BJP
Nana Patole criticizes BJP

मुंबई - देशात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात मुकेश अंबानी यांची छबी खराब झाली आहे. तसेच अंबानी यांचे शेअर बाजारात लाखो कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. अंबानी यांना सहानुभूती मिळावी, यासाठी तर भाजपचा खटाटोप नाही ना? अशी शंका नाना पटोले यांनी माध्यमांच्या समोर उपस्थित केली.

पटोले म्हणाले, की अंबानी यांना या आधी सुद्धा धमकी देण्यात आली होती. 2009 साली बोरडे नावाच्या व्यक्तीचे नाव पुढे आले होते. पण त्या संशयित आरोपीचा ही मृतदेह मिळाला होता. 2013 साली ही अंबानी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ही गोटे आढळले होते. मुंबईत अनेक मोठे उद्योगपती राहत असताना केवळ अंबानी यांनाच धमकी का मिळते. अंबानी यांना घराच्या वर हेलिपॅड तयार करण्याची परवानगीही अद्याप मिळाली नाही, ही परवानगी मिळवण्यासाठी भाजपकडून वातावरण निर्मिती केली जात आहे का? असा ही आम्हाला संशय येतो यावर भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी.

नाना पटोले माध्यमांशी बोलताना

हे ही वाचा - ओबीसी आरक्षणप्रश्नी मुंबईत भाजपचा आक्रोश मोर्चा; पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात

या अधिवेशनात भाजप अंबानी यांना मदत करत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे माझा हा थेट आरोप आहे की, हे अधिवेशन फक्त अंबानी यांना मदत करावी म्हणून भाजप गोंधळ उडवून त्या गाडी संदर्भात चर्चा घडवून आणण्याचं काम विरोधी पक्ष करत आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

हे ही वाचा - सोलापूर : मोहोळ तुरुंगातील 13 कैद्यांना कोरोनाची लागण

Last Updated : Mar 10, 2021, 4:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.