ETV Bharat / city

बार्ज पी-३०५ दुर्घटना : मुंबई पोलिसांनी काही कंपन्यांना बजावले समन्स

author img

By

Published : May 26, 2021, 10:22 PM IST

मुंबई पोलिसांनी पी-३०५ प्रकरणात काही कंपन्यांना समन्स बजावले आहेत. तौक्ते चक्रीवादळात बार्ज पी-305 बुडाले होते. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला होता.

Barge P 305
बार्ज पी-३०५ दुर्घटना

मुंबई - पोलिसांनी पी-३०५ प्रकरणात काही कंपन्यांना समन्स बजावले आहेत. तौक्ते चक्रीवादळात बार्ज पी-305 बुडाले होते. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला होता. तर 188 कर्मचाऱ्यांना भारतीय नौदलाने वाचवले होते. या प्रकरणी यलोगेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. या संपूर्ण प्रकरणात बार्जमधून वाचलेल्या १० जणांचे जबाब आतापर्यंत नोंदवलेले आहेत.

हेही वाचा - नवीन डिजीटल कायदा; अंमलबजावणीचा अहवाल द्या, केंद्राचे सोशल मीडिया कंपन्यांना आदेश

पी-305 या बार्जवरील कर्मचाऱ्यांच्या बचावकार्यासाठी भारतीय नौदलाच्या बियास, बेतवा आणि तेग या जहाजांनी 'आयएनएस कोची' आणि 'आयएनएस कोलकाता' यांच्यासोबत मिळून बचावकार्य केला. याबरोबरच नौदलाच्या हेलिकॉप्टरचीसुद्धा या बचावकार्यात मदत घेतली. 17 मे रोजी हे बचावकार्य सुरू झाले होते.

'बार्ज पी305'च्या कॅप्टनवर गुन्हा दाखल

अरबी समुद्रात पी-३०५ हे बार्ज बुडाल्याप्रकरणी कॅप्टन राकेश बल्लव याच्या विरोधात यलोगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. बार्जवरील अभियंते मुस्तफिर रेहमान हुसेन शेख यांनी केलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चक्रीवादळाची सूचना असतानाही, कॅप्टन राकेश बल्लव याने बार्ज वेळीच न हलवता, इतर कर्मचाऱ्यांच्या जीव धोक्यात घातला. यानंतर बार्ज बुडून काही कर्मचारी जखमी झाले, तर काहींचा मृत्यू झाला. या सर्व दुर्घटनेस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हेही वाचा - 'गोपनीयतेचा अधिकार मुलभूत हक्क, पण राष्ट्रीय सुरक्षेचीही सरकारवर जबाबदारी'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.