ETV Bharat / city

Mumbai cruise drugs case : मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणाचा तपास एनआयएकडे जाण्याची शक्यता

author img

By

Published : Oct 30, 2021, 8:57 AM IST

क्रूझ ड्रग्स प्रकरणाचा तपास राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी (एनआयए) करण्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एनआयएच्या तीन अधिकाऱ्यांनी एनसीबीच्या अधिकाऱ्यांशी मुंबईत तब्बल तीन तास चर्चा केली असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

Mumbai cruise drugs case
Mumbai cruise drugs case

मुंबई - मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणाचा तपास राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी (एनआयए) करण्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एनआयएच्या तीन अधिकाऱ्यांनी एनसीबीच्या अधिकाऱ्यांशी मुंबईत तब्बल तीन तास चर्चा केली असल्याची माहिती देखील समोर येत आहे. एनआयएने मुंबई क्रूस ड्रग्ज प्रकरणाची संबंधित सर्व माहिती एनसीबीकडून घेतली आहे. अहवालानुसार या प्रकरणाची लिंक आंतरराष्ट्रीय रॅकेटशी संबंधित असू शकते. या हायप्रोफाईल प्रकरणात मोठा कट आणि देशाला असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन तपास एनआयएकडे सोपवला जाण्याची शक्यता आहे. यापूर्वीही मुंबई ड्रग्ज प्रकरणाच्या तपासात अनियमिततेचे अनेक आरोप झाले आहेत. या संदर्भात एनआयए पुढील तपास करणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच दिल्लीत एनआयए आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली असल्याची माहितीदेखील सूत्रांकडून मिळाली आहे.

तपास एनआयएकडे? -

आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रे दाखल केले होते. या प्रतिज्ञापत्रात त्याने धक्कादायक आरोप केले. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला रिलीज करण्यासाठी 25 कोटी रुपयांची डील होणार होती. त्यातले 8 कोटी रुपये समीर वानखेडे यांना मिळणार होते. तसे फोनवरील संभाषण ऐकल्याचा दावा प्रभाकर साईलने केला. याच गंभीर आरोपांची दखल घेत राज्य सरकारने समीर वानखेडे यांच्याविरोधात चौकशीची घोषणा केली आहे. तसेच प्रभाकर साईल, ऑड सुधा द्विवेदी, ऑड कनिष्का जयंत आणि नितीन देशमुख यांनी केलेल्या विविध तक्रार अर्जांची एकत्रित चौकशी करण्यासाठी 4 पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक राज्य सरकारकडून जाहीर केली गेली आहे. गेले अनेक दिवस नवाब मलिक विरुद्ध समीर वानखेडे असा सामना उभ्या महाराष्ट्राने पाहिला. आता राज्य सरकारने वानखेडेंविरोधात चौकशी लावल्याने सरकार विरुद्ध वानखेडे असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

वानखेडेंच्या सुरक्षेत वाढ -

दरम्यान, समीर वानखेडेंच्या सुरक्षेमध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने वाढ केली आहे. त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात येईल. समीर वानखेडे आपल्या आणि कुटुंबीयांच्या जिवाला धोका असल्याचे समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं होते. त्यानंतर समीर वानखेडेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

प्रभाकर साईलचे आरोप काय? -

आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रे दाखल केले आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. केपी गोसावी आणि सॅम डिसूझाचे मी फोनवरील संभाषण ऐकले होते. 25 कोटींचा बॉम्ब टाका. 18 कोटीपर्यंत डील फायनल करू. त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असे या दोघांमध्ये संभाषण झाल्याचे साळी यांचा दावा आहे. आपण के.पी गोसावी यांचे बॉडीगार्ड असल्याचा दावाही साईल यांनी केला आहे. त्यानंतर गोसावीने मला फोन केला आणि पंच म्हणून राहण्यास सांगितले. एनसीबीने 10 कोऱ्या कागदांवर माझी सही घेतली. तसेच मी गोसावींना 50 लाखांच्या दोन बॅगाही दिल्या होत्या, असेही प्रभाकर साईलनी सांगितले. 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजून 45 मिनिटाने गोसावीने मला फोन केला होता. तसेच 2 ऑक्टोबर रोजी 7.30 वाजेपर्यंत तयार राहण्यास मला सांगण्यात आले. गोसावींनी मला काही फोटोही पाठवले होते. फोटोत जे लोक दिसत आहेत, त्यांचे हे फोटो मला दाखवण्यात आले होते. ग्रीन गेटवर याच लोकांची ओळख पटवण्यास सांगितल्याची धक्कादायक माहितीही साईल यांनी दिली आहे.

हेही वाचा - अन् महेंद्रसिंह धोनी बनला भारतीय संघाचा कॅप्टन; शरद पवारांनी सांगितला किस्सा!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.