ETV Bharat / city

Maharashtra Weather Forecast : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; 'या' ठिकाणी ऑरेंज अलर्ट, राज्यात एनडीआरएफची पथके तैनात

author img

By

Published : Aug 7, 2022, 11:10 AM IST

Maharashtra Weather Forecast
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय

हवामान विभागाने ( Meteorological Department ) पुढील 3 ते 4 दिवस मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली ( Orange Alert ) आहे. आज सकाळपासूनच मुंबई परिसरात पाऊस ( Heavy Rains in Mumbai ) सुरू आहे. कल्याण, ठाणे भागात सकाळपासून जोरदार पाऊस आहे. गेल्या २४ तासांत पुण्यात हलका ते हलका पाऊस पडला असून, बहुतांशी घाट भागात पाऊस झाला. पुढील ४ ते ५ दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांसह महाराष्ट्रामध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने ( NDRF Teams Deployed ) वर्तवली आहे.

मुंबई : राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होत असून, हवामान विभागाने ( Meteorological Department ) ऑरेंज अलर्ट ( Orange Alert ) दिला आहे. मुसळधार ( IMD ) पावसामुळे राज्यात शेतकऱ्यांचे बहुतांश ठिकाणी ( Farmers have Suffered Huge Losses ) मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे ( Heavy Rains in Mumbai ) शेतकऱ्यांसाठी आणखी पुढील 3 दिवस हे वैऱ्याचे आहेत. राज्यात कोल्हापूर, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, मुंबई, नाशिक, ठाणे, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागांत 9 ऑगस्टपर्यंत हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.

मुंबईसह उत्तर कोकणामध्ये मुसळधार होण्याची शक्यता : हवामान विभागाने पुढील 3 ते 4 दिवस मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज सकाळपासूनच मुंबई परिसरात पाऊस सुरू आहे. कल्याण, ठाणे भागात सकाळपासून जोरदार पाऊस आहे. गेल्या २४ तासांत पुण्यात हलका ते हलका पाऊस पडला असून, बहुतांशी घाट भागात पाऊस झाला. पुढील ४ ते ५ दिवसांचा मान्सून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांसह महाराष्ट्रामध्ये मान्सून सक्रिय होण्याची अपेक्षा आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे. कोकणात सकाळपासून पाऊस सुरू आहे. ठाणे 27.0 मि.मी, रत्नागिरी 62.7 मि.मी, डहाणू 57.5 मि.मी, हर्णै ४७.० मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

  • 5.30 pm, कोकणातला पाऊस सकाळ पासून
    Thane 27.0 mm
    Ratnagiri 62.7 mm
    Dahanu 57.5 mm
    Harnai 47.0 mi

    - IMD

    — K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुंबईत आज सकाळपासून पाऊस : राज्याच्या इतर भागांप्रमाणेच शनिवारी मुंबईच्या काही भागांत जोरदार पाऊस झाला. मुंबईमध्ये रिमझिम पाऊस झाला, तर उपनगरांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, राज्यात पुढील पाच दिवस मान्सून सक्रिय राहणार असून, त्याचे प्रमाण हळूहळू वाढत जाणार आहे. पुढील पाच दिवसांमध्ये राज्यात जोरदार पाऊस होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर मच्छिमारांनी मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये, असे आवाहन हवामान विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार ( Heavy rains in Sindhudurg ) पावसामुळे गडनदीला पूर आला आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी एक असलेल्या गडनदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, अनेक भागात पुराचे पाणी घुसलं आहे. कणकवली आचरा मार्गावर पाणी आल्याने हा मार्ग बंद झाला. तर माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला महापूर आल्याने कुडाळ तालुक्यातील 27 गावांचा संपर्क तुटलाय आहे.

उत्तर कोकणात मुसळधार पावसाची शक्यता : सिंधुदुर्गात रात्रभर सुरू असलेल्या पावसाचा फटका कणकवली तालुक्यातील बावशी गावातील दशरथ मर्ये यांच्या कुटुंबाला बसलाय...सततच्या पावसामुळे मर्येंचं घर कोसळलंय...दैव बलवत्तर म्हणून मोठ्या संकटातून हे कुटुंब बचावलंय...या घरात लहान मुलगी आणि तिची आजी होती...मोठा आवाज येताच दशरथ मर्ये धावत त्या खोलीत आले आणि त्यांनी मुलीला आजीला बाहेर काढलं.

  • Gradual increase in the rainfall activity expected over the region during next 5 days . येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा I तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/89p4H3yVNq भेट द्या pic.twitter.com/yyLZiUFoeB

    — Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मराठवाड्यात मुसळधार : नांदेड जिल्ह्यात नायगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर मांजरम आणि लोहा तालुक्यातील उमरा भागात मुसळधार पावसामुळे कहाळा, पाटोदा, मण्याळ, बरबडा भागात नाल्यांना पूर आला. यामुळे या भागातील शेकडो हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले. तत्काळ पंचनामे करून पिकविमा मिळवून देण्याची मागणी येथील शेतकरी करीत आहेत.

एनडीआरएफची पथके तैनात : एक जूनपासून ते आतापर्यंत राज्याच्या 28 जिल्ह्यातील 314 गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यामुळे पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी राज्य सरकारकडून खबरदारी घेण्यात येत असून, राज्याच्या विविध भागांमध्ये एनडीआरएफ व एसडीआरएफच्या 14 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पुढील पाच दिवस राज्यात पाऊस सक्रिय राहणार असल्याने हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे नदी काठच्या गावांना काळजी घेण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे.

बीड जिल्ह्यात ढगसदृश पाऊस : बीड जिल्ह्यातच ढगफुटीसदृश पाऊश झाला आहे. त्यामुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. रात्री परळी तालुक्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. पांगरी लिंबोटा तळेगाव या गावातील भागात तर ढगफुटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील धरण पूर्ण भरले : बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा 85 टक्के भरलंय. धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणाच्या कॅचमेंट परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असल्यानं पाण्याची आवक वाढलीय. पाणीपातळी संतुलित राहावी यासाठी धरणाचे तीन दरवाजे खुले करण्यात आलेत.

वाशिम जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार : वाशिम जिल्ह्यात मागील 5 दिवसापासून पावसांनी जोरदार हजेरी लावली. मालेगाव तालुक्यातील राजुरा, सुकांडा, खैरखेडा, अमानवाडी परिसरात ढगफुटी सारखी परिस्थिती निर्माण झाली. अतिपावसामुळे पिकांसह शेतकऱ्याची जमीन खरडून गेली. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेतीचे पंचनामे करून भरीव आर्थिक मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत.

हेही वाचा : Suicide of Indian woman in New York : न्यूयाॅर्क शहरात भारतीय महिलेची आत्महत्या; मृत्यूपूर्वी छळाची व्हिडिओमधून दिली माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.