ETV Bharat / city

कोरोनाकाळातील कामाबद्दल अंगणवाडी, आशा सेविकांच्या कामाला मुजरा- मुख्यमंत्री

author img

By

Published : Jun 7, 2021, 4:59 PM IST

आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका राज्य प्रशासनाचा पाठकणा असून स्वत:ची प्रकृती, कुटुंबियांची काळजी न करता ग्रामीण भागात कोरोनाच्या या संकट काळात आरोग्य सेवा देत आहेत. त्यासाठी मी त्यांना मानाचा मुजरा करतो. या शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका राज्य प्रशासनाचा पाठकणा असून स्वत:ची प्रकृती, कुटुंबियांची काळजी न करता ग्रामीण भागात कोरोनाच्या या संकट काळात आरोग्य सेवा देत आहेत. त्यासाठी मी त्यांना मानाचा मुजरा करतो. या शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक
आशा, अंगणवाडी सेविकांच्या ज्या व्यथा, अपेक्षा आहेत त्याची योग्य ती दखल घेण्यात आली आहे. आपले ऋण विसणार नाही. आपल्या व्यथांवर मार्ग काढला जात आहे. त्याला थोडा अवधी द्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी आशाताईंना केले. महाराष्ट्राचे कुटुंब आपण तळ हाताच्या फोडासारखे जपत आला आहात तज्ज्ञांच्या मतानुसार कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका मुलांमध्ये जाणवणार असून ती रोखण्यासाठी आशाताईंची भूमिका महत्वाची असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुलांमधील कोरोना संसर्ग आणि आशा सेविकांची जबाबदारी या विषयावर बालरोग तज्ज्ञाच्या टास्कफोर्सच्या सदस्यांनी आशा सेविकांशी संवाद साधला. दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी सेविका आणि अशा वर्कर यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचे कौतुक केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी केले आवाहन
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका मुलांमध्ये असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ही लाट रोखण्यासाठी ‘आशा’ सेविकांची भूमिका महत्वाची आहे. पालकांनी घाबरून जाऊ नयेत, यासाठी त्यांना आश्वस्त करताना कोरोनामुक्त गावासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी. गावातील वस्तीची जबाबदारी घेऊन कोरोनामुक्तीसाठी त्यांना मार्गदर्शन करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी अशा वर्कर यांना केले. तसेच कोरोना व्यतिरिक्त एखाद्या आजाराची साथ, लक्षणे आढळल्यास त्याची तातडीने माहिती प्रशासकीय यंत्रणेला द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी आशा सेविकांना केले. बालकांची काळजी घेण्याबाबत पालकांना मार्गदर्शन करावे. त्यांनी घाबरून जाऊ नये, यासाठी त्यांना आश्वस्त करण्याचे काम आशा सेविकांनी करावे. कुटुंबातील सदस्यांच्या माध्यमातूनच बालकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी याबाबत नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

'कुपोषणामुळे बालमृत्यू होणार नाही याकडे लक्ष द्या'
कोरोना व्यतिरिक्तही कुपोषणाचे संकट आहे. त्याला सामोरे जाताना कुपोषणामुळे बालमृत्यू होणार नाही याकडे लक्ष द्यावे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, राज्य शासनाच्या कोरोनामुक्त गाव मोहिमेबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करा. गावातील वाड्या-वस्त्यांची जबाबदार घेऊन त्यांना कोरोनामुक्तीसाठी मार्गदर्शन करा असे सांगितले. यावेळी टास्क फोर्समधील डॉ. प्रभू, डॉ. येवले, डॉ. किणीकर, डॉ. दलवाई यांनी कोरोना प्रतिबंध व उपचार, लहान मुलांसाठी पौष्टीक आहार, मानसिक आजार याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी मुरबाड येथील रोहीणी भोंदिवले, पातोंडा जि. नंदूरबार येथील साधना पिंपळे, भंडारा येथील भुमिका बंजारी, हिंगोली येथील सुनिता कुरवडे या आशा सेविकांनी मनोगत व्यक्त केले. मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी, यांच्यासह राज्यभरातील सुमारे ७० हजार आशा सेविका या ऑनलाइन परिषदेत सहभागी झाल्या होत्या.

हेही वाचा - 'ब्लू टीक' पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्या - नवाब मलिक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.