ETV Bharat / city

लोकशाहीच्या निवडणुकांवरच देशाचे भवितव्य अवलंबून - शिवराज पाटील-चाकूरकर

author img

By

Published : Apr 18, 2019, 2:16 PM IST

सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावून देशाची लोकशाही अधिक प्रबळ करावी, असे आवाहनही शिवराज पाटील-चाकूरकर यांनी केले.

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर

लातूर - लोकसभेची ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. यावरच देशाचे भवितव्य अवलंबून आहे. मतदारांनी आपला हक्क बजावून लोकशाही बळकट करणे आवश्यक आहे, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांनी व्यक्त केले. मतदान केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांची प्रतिक्रिया

लातूर येथील कम्युनिटी हॉल मतदान केंद्रावर त्यांनी साडे आठच्या दरम्यान मतदानाचा हक्क बजावला. लोकसभा निवडणूक ही काही गल्ली-गावाची निवडणूक नाही. यंदा नवमतदारांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावून देशाची लोकशाही अधिक प्रबळ करावी, असे आवाहनही शिवराज पाटील चाकूरकर यांनी केले.

Intro:'या' निवडणुकांवरच देशाचे भवितव्य : चाकूरकर
लातूर : लोकसभेची ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. यावरच देशाचे भवितव्य अवलंबून आहे. मतदारांनी आपला हक्क बजावून लोकशाही बळकट करणे आवश्यक असल्याचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी सांगितले. लातुर येथील मतदान केंद्रावर त्यांनी 8:30 वाजता मतदानाचा हक्क बजावला.Body:लोकसभा निवडणूक ही काही गल्ली- गावाची निवडणूक नाही तर या निवडणुकीवर देशाचे। भवितव्य अवलंबून आहे. यंदा नावमतदारांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावून देशाची लोकशाही अधिक प्रबळ करण्याचे त्यांनी आवाहन केले.Conclusion:येथील कम्युनिटी हॉल मध्ये त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.