ETV Bharat / city

Sanjay Raut On BJP : पैसे फक्त आमच्याकडेच आहेत का.. भाजपचे लोक भीक मागतायेत का? -राऊत

author img

By

Published : Mar 23, 2022, 1:44 PM IST

शिवसेना नेते संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत

किरीट सोमय्यांनी जे आरोप केले ते काही देशाचे मुख्य न्यायमूर्ती झाले का? असा सवाल करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी सौमया यांच्यावर चांगलाच हल्ला चढवला. (Sanjay Raut In Nagpur) भाजप तपास यंत्रणेचा गैरवापर करत आहे असे म्हणत, भाजपवाल्यांकडे पैसे नाहीत तर मग ते काय भीक मागतायेत का ? अशी थेट टीकाही त्यांनी केली आहे.

नागपूर - किरीट सोमय्यांनी जे आरोप केले ते काही देशाचे मुख्य न्यायमूर्ती झाले का? असा सवाल करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी सौमया यांच्यावर चांगलाच हल्ला चढवला. (Sanjay Raut On BJP ) भाजप तपास यंत्रणेचा गैरवापर करत आहे असे म्हणत, भाजपवाल्यांकडे पैसे नाहीत तर मग ते काय भीक मागतायेत का ? अशी थेट टीकाही त्यांनी केली आहे.

राऊत पत्रकारांशी बोलताना

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर - ज्या पद्धतीने सिरीयल किलर असतात, रेपिस्ट असतात त्या पद्धतीनेच भाजपचे सोमय्या सीरियल कम्प्लेंट झालेले आहे. असा घणाघात राऊत यांनी यावेळी केला आहे. (Sanjay Raut On ED) केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर दबाव आणला जात आहे. मात्र, पंश्चिम बंगाल झुकणार नाही आणि महाराष्ट्र तुटणार नाही असही राऊत म्हणाले आहेत.

भाजपचे लोक काय भीक मागत आहे का? - नागपूरात फिरत असताना इथले उड्डान पूल, रेल्वे पूल मेट्रोचे पूल एअरपोर्ट दिसत आहे. भाजपचे लोक काय भीक मागत आहे का? ईडीचे अधिकारी फक्त आमच्याच मागे लागलेत. आमच्याकडे पैसे आहेत. भाजपच्या नेत्यांकडे काहीच पैसे नाही. तर ते काय भीक मागत आहेत का? असा टोलाही राऊत यांनी यावेळी लगावला आहे.

त्यांना कोर्टाकडून दिलासा मिळतो - न्यायल्याकडू काही लोकांना दिलासा दिला जातो. मात्र, आमच्या तक्रारीवर काहीच होत नाही असे म्हणत राऊतांनी थेट न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला आहे. (Sanjay Raut On Kirit Somaiya) महाराष्ट्र सरकार ज्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना कोर्टाकडून दिलासा मिळतो असे म्हणत अप्रत्यक्ष राऊत यांनी राणे यांच्या प्रकरणावर भाष्य केले आहे.

सर्वाधिक 650 कोटी जमा झाले - परमवीर सिंग यांच्यासारखे 25 लोकांची यादी आहे. त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळतो. मात्र, महाविकास आघाडीच्या कुठलाही नेत्यांना दिलासा मिळत नाही. मुंबईचे जितेंद्र नलावणी यांच्यावर कायदेशीर पद्धतीने कारवाई होईल. गुजरातच्या अहमदाबाद येथील बँकेचे एकाच दिवसात सर्वाधिक 650 कोटी जमा झाले असही राऊत म्हणाले आहेत.

हेही वाचा - Inquiry of Pankaj Dahane : फोन टॅपिंग प्रकरणी तत्कालीन पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांची चौकशी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.