ETV Bharat / city

कोरोना संपत आला...काही दिवसांत सरकार येईल- चंद्रकांत पाटील

author img

By

Published : Nov 22, 2021, 6:53 PM IST

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Maharashtra BJP president Chandrakant Patil) म्हणाले, की विश्वासघाताने गेलेले सरकार मेहनतीनेसुद्धा आणता येते. ज्या राज्यकर्त्याला भविष्य कळते, त्याला आगामी काळातही देशात मोदींचे सरकार येणार हे माहिती आहे. आता कोरोनाची भीती (Chandrakant Patil on corona crisis) संपत आली आहे.

कोल्हापूर - राज्यातील सरकार विश्वासघाताने गेले आहे. मात्र, कोरोना काळ असल्याने आम्ही तेवढे असंवेदनशील नसल्याने याबाबत काही प्रयत्न केले नाही. विश्वासघाताने गेलेले ते सरकार पुन्हा येईल असे सूचक वक्तव्य भाजपचे प्रदेशाक्षध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. ते कोल्हापूरात भाजपच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Maharashtra BJP president Chandrakant Patil) म्हणाले, की विश्वासघाताने गेलेले सरकार मेहनतीनेसुद्धा आणता येते. ज्या राज्यकर्त्याला भविष्य कळते, त्याला आगामी काळातही देशात मोदींचे सरकार येणार हे माहिती आहे. आता कोरोनाची भीती (Chandrakant Patil on corona crisis) संपत आली आहे. सगळे काही पूर्वपदावर येत आहे.

हेही वाचा-Amravati Violence देवेंद्र फडणवीसांनी बेजबाबदार वक्तव्ये करू नयेत- यशोमती ठाकूर

ती वेळ काही महिन्यांची नाही तर काही दिवसांची...

विश्वासघाताने गेलेले सरकार मेहनतीने आणता येते, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी (Chandrakant Patil on gov fromation in Maharashtra) सूचक वक्तव्य केले. याबाबतच नेमके काय म्हणायचे आहे, हे विचारले असते ते म्हणाले, हे आता जाहीरपणे सांगण्याची अद्याप वेळ आली नाही. वेळ आल्यावर सांगेन. ती वेळ काही महिन्यांची नाही. काही दिवसांची आहे. चांगल्या कामाला नेहमी लवकरचा मुहूर्त शोधायचा असतो. नवीन वर्षात आपले सरकार येईल, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

हेही वाचा-महाराष्ट्राला गुजरातप्रमाणेच दंगलीची प्रयोगशाळा करायची आहे काय? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भाजपला सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.