ETV Bharat / city

Amravati Violence देवेंद्र फडणवीसांनी बेजबाबदार वक्तव्ये करू नयेत- यशोमती ठाकूर

author img

By

Published : Nov 22, 2021, 4:42 PM IST

Updated : Nov 22, 2021, 9:02 PM IST

राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या, की अमरावती जिल्ह्यामध्ये १२ आणि १३ नोव्हेंबरला झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमधील सर्व दोषींवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. कारवाई करण्यात येत आहे. केवळ एका विशिष्ट समाजाला वेठीस धरणे किंवा गुन्हे दाखल करणे असा कोणताही प्रकार राज्य सरकार अथवा गृहमंत्रालयाकडून होत नाही.

Yashomati Thakur
यशोमती ठाकूर

मुंबई/अमरावती अमरावतीमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. विरोधी पक्षनेत्यांचे आरोप अत्यंत बेजबाबदार आणि बिनबुडाचे आहेत. देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू आणि जबाबदार नेते आहेत, असा माझा समज होता. मात्र त्यांनी तो खोटा ठरवला आहे, अशी प्रतिक्रिया महिला आणि बालविकास मंत्र्यांनी दिली आहे.

राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या, की अमरावती जिल्ह्यामध्ये १२ आणि १३ नोव्हेंबरला झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमधील (Amravati Violence incident ) सर्व दोषींवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. कारवाई करण्यात येत आहे. केवळ एका विशिष्ट समाजाला वेठीस धरणे किंवा गुन्हे दाखल करणे असा कोणताही प्रकार राज्य सरकार अथवा गृहमंत्रालयाकडून होत नाही.

यशोमती ठाकूर

हेही वाचा-धक्कादायक : रक्षकच झाला भक्षक; महाविद्यालयीन तरुणावर पोलीस कर्मचाऱ्याकडून अनैसर्गिक अत्याचार


काय होते देवेंद्र फडणवीस यांचे आरोप?

अमरावतीतील हिंसाचारानंतर केवळ १३ तारखेला झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये दोषींवर सरकार कारवाई करत असल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. १२ तारखेला झालेल्या घटनांमधील दोषींवर राज्य सरकार कारवाई करत नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यासंदर्भात यशोमती ठाकूर यांनी स्पष्टीकरण द्यावे असे त्यांनी आवाहन केले होते.

हेही वाचा- मंत्री यशोमती ठाकूर यांच्यामुळेच जिल्ह्यातील शांतता भंग - भाजप जिल्हाध्यक्ष


सर्व दोषींवर कारवाई - यशोमती ठाकूर

दरम्यान, जनतेला वेठीस धरणाऱ्या आणि जातीय विद्वेष निर्माण करणाऱ्या, तरुणांची माथी भडकाविणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही, अशा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला. त्या म्हणाल्या की, दोन्ही बाजूच्या दोषींवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. उलट 13 तारखेला झालेल्या हिंसाचाराच्या घटनेतील दोषीपेक्षा 12 तारखेला ज्यांनी हिंसाचार करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर अधिक गुन्हे दाखल केले आहेत. फडणवीस यांनी जबाबदारपणे वक्तव्य करावीत. मात्र, माथी भडकवणाऱ्या कोणालाही सोडणार नाही, असा सज्जड दम त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा-Amravati Violence : अमरावती शांतच राहू दे.. दोन्ही बाजूंच्या दोषींवर कारवाई करणार, यशोमती ठाकूर यांनी फडणवीसांना खडसावले

'रझा अकादमीवर बंदीची हिंमत आहे का?'

रझा अकादमी (raza academy) काँग्रेसच्या काळातच का पोलिसांवर हल्ले करते, असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला होता. ते म्हणाले, की ही कोणाची बी टीम आहे आणि कोणाची ए टीम आहे. त्यांचे कोणा नेत्यांसोबत फोटो आहेत, हे तपासावे. त्यावर बंदीची आम्ही मागणी घालतो. मात्र ती बंद करण्याची काँग्रेसची हिंमत आहे का, असा सवाल त्यांनी केला. देशभरात दंगली घडवून अल्पसंख्याकांना भडकावण्याचे काम काही पक्ष करत आहेत. मोदींच्या विकासाचा सामना करू शकत नाहीत, म्हणून अल्पसंख्याक समाजाला भडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचे फडणवीस म्हणाले होते.

Last Updated : Nov 22, 2021, 9:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.