अमरावती - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मागील दीड वर्षांपासून ग्रामीण भागाच्या एकाही ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा पार पडली नाही. त्यामुळे लोकांच्या प्रश्नांवरही चर्चा झाली नाही, दरम्यान आता राज्यातील कोरोनाची परिस्थितीही आटोक्यात आली आहे. सोबतच अमरावती जिल्ह्यातही कोरोना रुग्णात घट झाली आहे. निर्बंधही आता मोठ्या प्रमाणावर शिथिल झाले आहेत. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील जवळपास 822 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींना ग्रामसभा घेण्याची परवानगी अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अविशांत पंडा यांनी दिली होती. परंतु मात्र शनिवारी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यात कोणीही ग्रामसभा घेऊ नये. ग्रामसभा घ्यायची असेल तर ती ऑनलाईन पद्धतीने घ्यावी, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे मात्र ग्रामीण भागात या निर्णयाबद्दल लोकांची नाराजी होत आहे. ग्रामीण भागात नेटवर्कची मोठी अडचण आहे त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने ग्रामसभा घेणे शक्य नसल्याच ग्रामस्थांचा मत आहे.
ग्रामसभा ऑनलाइन पध्दतीने घ्या, ग्रामविकास मंत्र्यांच्या निर्णयावर ग्रामीण भागात नाराजी
अमरावती जिल्ह्यातील जवळपास 822 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींना ग्रामसभा घेण्याची परवानगी अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अविशांत पंडा यांनी दिली होती. परंतु मात्र शनिवारी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यात कोणीही ग्रामसभा घेऊ नये. ग्रामसभा घ्यायची असेल तर ती ऑनलाईन पद्धतीने घ्यावी, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे मात्र ग्रामीण भागात या निर्णयाबद्दल लोकांची नाराजी होत आहे.
![ग्रामसभा ऑनलाइन पध्दतीने घ्या, ग्रामविकास मंत्र्यांच्या निर्णयावर ग्रामीण भागात नाराजी ऑनलाइन पध्दतीने ग्रामसभा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12779533-589-12779533-1629011334216.jpg?imwidth=3840)
अमरावती - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मागील दीड वर्षांपासून ग्रामीण भागाच्या एकाही ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा पार पडली नाही. त्यामुळे लोकांच्या प्रश्नांवरही चर्चा झाली नाही, दरम्यान आता राज्यातील कोरोनाची परिस्थितीही आटोक्यात आली आहे. सोबतच अमरावती जिल्ह्यातही कोरोना रुग्णात घट झाली आहे. निर्बंधही आता मोठ्या प्रमाणावर शिथिल झाले आहेत. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील जवळपास 822 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींना ग्रामसभा घेण्याची परवानगी अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अविशांत पंडा यांनी दिली होती. परंतु मात्र शनिवारी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यात कोणीही ग्रामसभा घेऊ नये. ग्रामसभा घ्यायची असेल तर ती ऑनलाईन पद्धतीने घ्यावी, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे मात्र ग्रामीण भागात या निर्णयाबद्दल लोकांची नाराजी होत आहे. ग्रामीण भागात नेटवर्कची मोठी अडचण आहे त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने ग्रामसभा घेणे शक्य नसल्याच ग्रामस्थांचा मत आहे.