ETV Bharat / bharat

Nana Patekar On Population : देशात पाण्यापेक्षाही वाढत्या लोकसंख्येचा धोका अधिक - नाना पाटेकर

author img

By

Published : Feb 16, 2023, 4:51 PM IST

ब्रह्मकुमारी संस्थांनच्या वतीने देशभरात जल जन अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाचा शुभारंभ सुप्रसिद्ध अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून ब्रह्मकुमारी संस्थान जलस्त्रोतांचा जिर्णोद्वार करणार आहे. यावेळी नाना पाटेकर यांनी जल जमीन सीमीत आहे. मात्र भारतापुढे लोकसंख्या वाढीचा खरा धोका असल्याचे स्पष्ट केले.

Nana Patekar On Population
अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर

सिरोही : ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीने आयोजित जल जन अभियानाचा शुभारंत्र सुप्रसिद्ध अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्या हस्ते अबुरोड येथे करण्यात आला. यावेळी बोलताना नाना पाटेकर यांनी देशात पाण्याचा प्रश्न गंभीर आहेच. मात्र वाढत्या लोखसंख्येचा प्रश्न त्याहूनही गंभीर असल्याचे मत व्यक्त केले. महाराष्ट्रातही पाण्याची समस्या असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

जल जमीन सीमीत आहे : अबुरोड येथे ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीने जल जन अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. अभिनेते नाना पाटेकर यांनी या अभियानाचा शुभारंभ करत अभियानाला शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना नाना पाटेकर यांनी लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. अगोदर आपली लोकसंख्या 35 कोटी होती, आता ती 135 कोटी आहे. आपल्याकडे जल आणि जमीन सीमीत आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येला रोखणे गरजेचे आहे. वाढती लोकसंख्या रोखण्यासाठी तात्काळ पावले उचलली जाणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे खाण्याचे वांदे : अभिनेते नाना पाटेकर यांनी जल जन अभियानाचा शुभारंभ करताना महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त कुटूंबीयांच्या अडचणींवरही भाष्य केले. महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त कुटूबियांचे खाण्याचे वांदे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांच्या खाण्याची व्यवस्था केली पाहिजे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. महाराष्ट्रातही पाण्याची खूप मोठी समस्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रकृतीने नेहमीच सारे काही दिले आहे. मात्र आम्ही त्याचा योग्य उपयोग करू शकत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

गावातील पलायन रोखले पाहिजे : भारतीय खेड्यात समृद्धी होती. मात्र आता गावातील मुले शिकण्यासाठी शहरात जातात. शहरात शिकल्यानंतर ते परत फिरुन आपल्या गावात जात नाहीत. त्यामुळे गावातील शेती ओस पडत आहे. शेती त्याच पद्धतीने न करता त्यात सुधारणा करुन नवीन पद्धतीने शेती करणे गरजेचे आहे. त्यासाठी गावातून होणारे पलायन आधी रोखले पाहिजे असेही नाना पाटेकर यांनी स्पष्ट केले. मुले मोठी झाल्यानंतर ती शहरात जातात आणि गावात परत येत नाहीत, हिच आमची मोठी समस्या असल्याचेही नाना पाटेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

ब्रह्मकुमारी देशभर करणार जसस्त्रोतांचा जिर्णोद्वार : ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने जल जन हे अभियान राबवण्यात येत आहे. हे अभियान ब्रह्मकुमारी संस्थान जलशक्ती मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने देशभर राबवत आहे. या अभियानाच्या माध्यमातून ब्रह्मकुमारी संस्थांन देशभरातील जलस्त्रोतांचा जिर्णोद्वार करणार आहे. जलशक्ती मंत्रालयाशी जोडलेले लोकं आठ महिने देशभरातील 5 हजार पेक्षा जास्त जलस्त्रोतांचा जिर्णोद्वार करण्यासाठी काम करणार आहेत. या अभियानाच्या माध्यमातून 10 हजार कार्यक्रमाचे आयोजन करुन 10 कोटी नागरिकांपर्यंत हे अभियान पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा - Shahjahan Urs Celebration Taj Mahal: ताजमहालमध्ये शाहजहानचा उर्स, शिवपार्वतीच बसले उपोषणाला, वाचा काय आहे प्रकार...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.