ETV Bharat / bharat

पाचही राज्यात फक्त भाजपाच सत्तेत येणार - पीयूष गोयल

author img

By

Published : Feb 27, 2021, 8:31 PM IST

आसाम, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ आणि पश्चिम बंगालमध्येही भाजपचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला. तसेच गोयल यांनी ममता बॅनर्जी यांच्यावरही टीका केली.

पीयूष गोयल
पीयूष गोयल

शिमला - केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल शनिवारी शिमला येथे पोहोचले. शिमलाच्या प्रसिद्ध कालीबारी मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना पीयूष गोयल यांनी आसाम, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ आणि पश्चिम बंगालमध्येही भाजपचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच गोयल यांनी ममता बॅनर्जी यांच्यावरही टीका केली.

पाचही राज्यात फक्त भाजपाच सत्तेत येणार - पीयूष गोयल

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका 8 टप्प्यात होत आहेत. मागील वेळी पश्चिम बंगालमध्ये 7 टप्प्यात निवडणुका घेण्यात आल्या होत्या. यावेळी आठ टप्प्यात होत आहेत. तर मग यात आरडाओरडा करण्यासारखे काय आहे. इतका राग कशाचा, असा सवाल त्यांनी केला.

निवडणूक आयोग ही स्वतंत्र घटनात्मक संस्था आहे. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यानंतर निवडणुका किती टप्प्यात घेता येतील, हे ठरले. त्यांच्या निर्णयाचे आपण स्वागत केले पाहिजे, असे गोयल म्हणाले.

पश्चिम बंगालमधील ममतांचे सरकार बदलणे निश्चित आहे. तेथे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोकांनी आपले आयुष्य मोठ्या संकटात घालवले आहे, असेही ते म्हणाले.

निवडणुकीच्या तारखांवरून ममता बॅनर्जी संतप्त -

भारतीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात विधानसभेच्या निवडणुका घेण्यात येणार असल्याचे जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संतप्त झाल्या आहेत. या निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शाह यांच्या सूचनेप्रमाणे जाहीर केल्याचा मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी संशय व्यक्त केला आहे. निवडणुकीच्या प्रचाराचे चांगले व्यवस्थापन करण्यासाठीच निवडणूक आयोगाने भाजपला मदत केल्याचा आरोपही मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत केला.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक -

पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान 8 टप्प्यात मतदान होणार आहे. मतदानाचा पहिला टप्पा हा 27 मार्चला पार पडेल. तर दुसरा टप्पा हा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिल, चौथा टप्पा 10 एप्रिल, पाचवा टप्पातील मतदान 17 एप्रिलला, तर सहावा टप्पा 22 एप्रिल, सातवा टप्पा 26 एप्रिलला आणि आठवा टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला पार पडेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.