ETV Bharat / bharat

दिल्लीतील शेतकरी आंदोलनात मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना तेलंगणा सरकार देणार ३ लाखांची मदत

author img

By

Published : May 22, 2022, 9:47 AM IST

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात ( Three Farm Laws) दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान ( Farmers Protest Delhi ) मृत पावलेल्या शेतकऱ्यांना तेलंगणा सरकारतर्फे मदत देण्यात येणार आहे. तीन लाख रुपयांची ही मदत तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या हस्ते आज चंदीगडमध्ये एका कार्यक्रमात वितरित करण्यात येणार ( Telangana CM to provide financial assistance ) आहे.

KCR
केसीआर

चंदीगड ( पंजाब ) : केंद्र सरकारने तीन कृषी कायदे तयार ( Three Farm Laws) केले, ज्यामुळे शेतकऱ्यांना दिल्लीत धरणे आंदोलन करण्यास प्रवृत्त ( Farmers Protest Delhi ) केले. या काळात अनेक शेतकऱ्यांना आपला जीवही गमवावा ( Punjab farmers who lost their lives ) लागला. त्यामुळे दिल्ली सीमेवर झालेल्या आंदोलनात प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तीन लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे चंदीगडमधील मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ही मदत देणार ( Telangana CM to provide financial assistance ) आहेत.

७०० शेतकऱ्यांचा मृत्यू : त्यांच्यासोबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान असतील. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षी आंदोलन संपण्याच्या पूर्वसंध्येला ही घोषणा केली होती. हा कार्यक्रम टागोर थिएटर, चंदीगड येथे होणार आहे. या आंदोलनात पंजाबमधील 600 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. 378 दिवसांच्या शेतकरी आंदोलनात सुमारे 700 शेतकऱ्यांचा बळी गेला. यापैकी 600 शेतकरी पंजाबचे होते. मात्र, हे कृषी कायदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंतर मागे घेतले. मात्र दुसऱ्याच दिवशी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत जाहीर केली. पंजाब सरकारने या कुटुंबांना आधीच सरकारी नोकऱ्या आणि 5 लाख रुपयांची भरपाई दिली होती.

जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचे कर्तव्य : दुसरीकडे राज्य सरकारच्या कृषी विभागाने सर्व जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना किसान आंदोलनादरम्यान प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना टागोर नाट्यगृहात आणण्याचे निर्देश दिले आहेत. पंजाबमधील मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून एवढी मोठी भरपाई देण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे.

काँग्रेस वगळता नव्या आघाडीची स्थापना : या कार्यक्रमाबाबत नव्या राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. आता देशात भाजपच्या विरोधात नवी आघाडी निर्माण होत आहे. मात्र, त्यात काँग्रेसचा सहभाग नाही. आम आदमी पक्षाचे नेतृत्व आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष आता बरोबर आले आहेत. के चंद्रशेखर राव त्यांच्यात सामील झाले आहेत. याशिवाय केजरीवाल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्याही संपर्कात आहेत.

दिल्ली शाळा आणि मोहल्ला क्लिनिकला भेट: तेलंगणाचे मुख्यमंत्री के. एस. चंद्रशेखर राव यांनी दिल्लीतील सरकारी शाळा आणि मोहल्ला क्लिनिकलाही भेट दिली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली. ते म्हणाले की दिल्लीतील शाळा आणि मोहल्ला क्लिनिकला भेट दिल्यानंतर आणि सुविधा पाहिल्यानंतर मुख्यमंत्री के. एस. चंद्रशेखर राव खूश आहेत.

हेही वाचा : KCR In Delhi : मोदींच्या विरोधात तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न जोरात.. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर दिल्लीकडे रवाना

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.