ETV Bharat / bharat

Death Of Elephants In India : देशात गेल्या 14 वर्षात 1 हजार 357 हत्तींचा मृत्यू

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 21, 2023, 3:34 PM IST

Death Of Elephants In India : भारतात हत्तींच्या मृत्यूबाबत धक्कादायक माहिती समोर आलीय. देशात गेल्या 14 वर्षात 1 हजार 357 हत्तींचा मृत्यू झाल्याचं आरटीआयमधून समोर आलंय. आरटीआयमध्ये मागितलेल्या माहितीनुसार, तज्ञ डॉ. मुथामिज सेल्वन यांनी याबाबत उत्तर दिलंय.

Death Of Elephants In India
Death Of Elephants In India
आरटीआय कार्यकर्ते हेमंत गोनिया यांची प्रतिक्रिया

हल्दवानी (उत्तराखंड) Death Of Elephants In India : देशात हत्तींसंदर्भात खळबळजनक माहिती समोर आलीय. गेल्या 14 वर्षात देशातील विविध राज्यांमध्ये 1 हजार 357 हत्तींचा मृत्यू झाल्याचं आरटीआयमध्ये उघड झालंय. यापैकी 897 हत्तींचा विजेचा धक्का लागून, 228 हत्तींचा ट्रेनच्या धडकेनं, 119 हत्तींचा शिकारीमुळं मृत्यू झालाय. तर 40 हत्तींना विषबाधा झाल्याचं माहितीतून उघड झालंय.

आरटीआयमध्ये हत्तींबाबत मोठा खुलासा : उत्तराखंडच्या हल्दवानी येथील रहिवासी आरटीआय कार्यकर्ते हेमंत गोनिया यांनी सांगितलं की, जून महिन्यात त्यांनी केंद्रीय जन माहिती अधिकारी, पंतप्रधान कार्यालयाकडून काही माहिती मागवली होती. प्रोजेक्ट एलिफंटची देखरेख करणारे तज्ञ डॉ. मुथामिझ सेल्वन यांच्याकडून या प्रश्नाला उत्तर देण्यात आलं. देशातील बहुतांश हत्तींचा मृत्यू विजेच्या धक्क्यानं झाल्याचं त्यांनी उत्तरात सांगितलंय.

14 वर्षात 1 हजार 357 हत्तींचा अकाली मृत्यू : गेल्या 13 वर्षात 898 हत्तींचा विजेचा धक्का लागून मृत्यू झालाय. हत्तींच्या मृत्यूचं दुसरं प्रमुख कारण म्हणजे रेल्वेची धडक असल्याचं सांगितलं जातंय. रेल्वेच्या धडकेनं 228 हत्तींना जीव गमवावा लागला आहे. उत्तराखंडमध्ये ट्रेनच्या धडकेने 27 हत्तींचा मृत्यू झाला आहे. आरटीआयमधून मिळालेल्या माहितीनुसार, ईशान्येकडील अरुणाचल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, नागालँड, पश्चिम बंगाल, मणिपूर, मिझोरामसह देशात हत्तींची संख्या 10 हजार 139 आहे.

भारतात 29 हजार 964 हत्ती आहेत : ओडिशा, झारखंड, छत्तीसगड, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल (दक्षिण) यांचा समावेश असलेल्या पूर्व मध्य भागात 3 हजार 128 हत्ती आहेत. उत्तर पश्चिम प्रदेशात उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचलमध्ये 2 हजार 85 हत्ती आहेत. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, अंदमान निकोबार बेटं या दक्षिणेकडील प्रदेशात हत्तींची संख्या 14 हजार 612 आहे. देशभरात हत्तींची एकूण संख्या 29 हजार 964 आहे.

वनविभागाच्या कारभारावर प्रश्न : आरटीआय कार्यकर्ते हेमंत गोनिया म्हणाले की, देशात ज्या प्रकारे हत्तींचा अचानक मृत्यू होत आहे, त्यामुळं वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. वन विभागालाही मोठं बजेट मिळतं. मात्र तरीदेखील हत्तींचा अकाली मृत्यू चिंताजनक बाब ठरत आहे. अशा स्थितीत केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालयानं हत्तींच्या संरक्षण, संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचं हेमंत गोनिया यांनी म्हटलंय.

हेही वाचा - Muratkar Work On Pastures : तृणभक्षकापासून चित्ते आणि वाघांच्या पोटाचा प्रश्न सोडविण्यास प्रा. डॉ. गजानन मुरतकर यांची महत्त्वाची भूमिका

आरटीआय कार्यकर्ते हेमंत गोनिया यांची प्रतिक्रिया

हल्दवानी (उत्तराखंड) Death Of Elephants In India : देशात हत्तींसंदर्भात खळबळजनक माहिती समोर आलीय. गेल्या 14 वर्षात देशातील विविध राज्यांमध्ये 1 हजार 357 हत्तींचा मृत्यू झाल्याचं आरटीआयमध्ये उघड झालंय. यापैकी 897 हत्तींचा विजेचा धक्का लागून, 228 हत्तींचा ट्रेनच्या धडकेनं, 119 हत्तींचा शिकारीमुळं मृत्यू झालाय. तर 40 हत्तींना विषबाधा झाल्याचं माहितीतून उघड झालंय.

आरटीआयमध्ये हत्तींबाबत मोठा खुलासा : उत्तराखंडच्या हल्दवानी येथील रहिवासी आरटीआय कार्यकर्ते हेमंत गोनिया यांनी सांगितलं की, जून महिन्यात त्यांनी केंद्रीय जन माहिती अधिकारी, पंतप्रधान कार्यालयाकडून काही माहिती मागवली होती. प्रोजेक्ट एलिफंटची देखरेख करणारे तज्ञ डॉ. मुथामिझ सेल्वन यांच्याकडून या प्रश्नाला उत्तर देण्यात आलं. देशातील बहुतांश हत्तींचा मृत्यू विजेच्या धक्क्यानं झाल्याचं त्यांनी उत्तरात सांगितलंय.

14 वर्षात 1 हजार 357 हत्तींचा अकाली मृत्यू : गेल्या 13 वर्षात 898 हत्तींचा विजेचा धक्का लागून मृत्यू झालाय. हत्तींच्या मृत्यूचं दुसरं प्रमुख कारण म्हणजे रेल्वेची धडक असल्याचं सांगितलं जातंय. रेल्वेच्या धडकेनं 228 हत्तींना जीव गमवावा लागला आहे. उत्तराखंडमध्ये ट्रेनच्या धडकेने 27 हत्तींचा मृत्यू झाला आहे. आरटीआयमधून मिळालेल्या माहितीनुसार, ईशान्येकडील अरुणाचल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, नागालँड, पश्चिम बंगाल, मणिपूर, मिझोरामसह देशात हत्तींची संख्या 10 हजार 139 आहे.

भारतात 29 हजार 964 हत्ती आहेत : ओडिशा, झारखंड, छत्तीसगड, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल (दक्षिण) यांचा समावेश असलेल्या पूर्व मध्य भागात 3 हजार 128 हत्ती आहेत. उत्तर पश्चिम प्रदेशात उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचलमध्ये 2 हजार 85 हत्ती आहेत. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, अंदमान निकोबार बेटं या दक्षिणेकडील प्रदेशात हत्तींची संख्या 14 हजार 612 आहे. देशभरात हत्तींची एकूण संख्या 29 हजार 964 आहे.

वनविभागाच्या कारभारावर प्रश्न : आरटीआय कार्यकर्ते हेमंत गोनिया म्हणाले की, देशात ज्या प्रकारे हत्तींचा अचानक मृत्यू होत आहे, त्यामुळं वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. वन विभागालाही मोठं बजेट मिळतं. मात्र तरीदेखील हत्तींचा अकाली मृत्यू चिंताजनक बाब ठरत आहे. अशा स्थितीत केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालयानं हत्तींच्या संरक्षण, संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचं हेमंत गोनिया यांनी म्हटलंय.

हेही वाचा - Muratkar Work On Pastures : तृणभक्षकापासून चित्ते आणि वाघांच्या पोटाचा प्रश्न सोडविण्यास प्रा. डॉ. गजानन मुरतकर यांची महत्त्वाची भूमिका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.