ETV Bharat / bharat

Goa Assembly Election 2022 : जवाहरलाल नेहरु यांनी गोव्याच्या मुक्तीकरिता सैनिक पाठविण्यास नकार दिला होता - पंतप्रधान नरेंद्र मोदी

author img

By

Published : Feb 10, 2022, 7:21 PM IST

Updated : Feb 10, 2022, 10:22 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

20:37 February 10

काँग्रेसमुळे गोव्याला स्वातंत्र्य मिळण्यास 15 वर्षे उशीर - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पणजी - गोवा विधानसभा निवडणुकीनिमित्त आयोजित केलेल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान मोदी म्हणाले, की काँग्रेसमुळे गोव्याला स्वातंत्र्य मिळण्यास 15 वर्षे लागली आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कामामुळे योजना 100 टक्के लाभार्थ्यांपर्यत पोहोचत असल्याचे त्यांनी यावेळी कौतुक केले. योजना 100 टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे हीच खरी धर्मनिरपक्षेता असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसला टोला लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांची आठवण येत असल्याचे म्हटले. पंतप्रधान म्हटले, की जेव्हा कधी या सागरी किनारपट्टीवर येतो, तेव्हा प्रिय मित्र मनोहर पर्रीकर ( माजी संरक्षण मंत्री ) यांची आठवण येते. गोवेकरांना तर त्यांची उपस्थिती अधिक जाणवत असेल. गोवेकरांच्या प्रेमामुळे येथे उभा, हे माझे भाग्य आहे.

हेही वाचा-India Corona Update : गेल्या 24 तासांत 67 हजार नवे रुग्ण, तर मृत्यूसंख्येत वाढ कायम

मत देण्याचे आवाहन

लोकांनी कम्युनिस्टचा खेळ पाहिला, कुटुंब, व्यक्तीवाद आणि जातीवाद पक्ष पाहिले. भाजपचे कार्यकर्ते ही पक्षाची सर्वात मोठी ताकद आहे. भाजपला दिलेले मत हे स्थिर आणि प्रगतीशील सरकारला दिलेले मत आहे. गोव्याच्या जनतेची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दिलेले मत आहे. गोवा गोल्डन होईल, अशी ग्वाही दिली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, असे आवाहन मोदींनी केले. तुमचे प्रयत्न वाया जाणार नाही, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला आहे. भाजपवर विश्वास दाखवावा आणि 14 फेब्रुवारीला मौलिक मत द्या, असे त्यांनी आवाहन केले.

हेही वाचा-MH MPs in Parliament : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?

जवाहरलाल नेहरु यांनी गोव्याच्या मुक्तीकरिता सैनिक पाठविण्यास नकार दिला होता

गोवा मुक्तीसंग्रामला उद्धवस्त करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. गोव्याला स्वातंत्र्य मिळण्यास काँग्रेसमुळे उशीर झाला. काही तासांचे काम मात्र, त्याला 15 वर्षे लागले. गोव्यातील लोकांना स्वातंत्र्यासाठी संघर्ष करावा लागला. सत्याग्रह करावा लागला. त्यांनी मदत केली नाही. गोव्याच्या स्वातंत्र्यासांठी सैनिक पाठविणार नसल्याचे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी लाल किल्ल्याच्या भाषणातून सांगितले. हे तुम्ही युट्यूबवर पाहू शकता. ही काँग्रेस तुम्हाला मते मागत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

हेही वाचा-PM Modi Speech in Goa Election : गोव्यातील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी 'या' 5 मुद्द्यांवर दिला भर

100 टक्के योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे ही खरी धर्मनिरपेक्षता

100 टक्के योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे ही खरी धर्मनिरपेक्षता आहे. गोव्यातील नागरिकांची राजकीय जाणीव अधिक आहे. मात्र, काँग्रेसला गोव्यातील तरुण आणि नागरिकांची स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा समजू शकली नाही. त्यांनी गोव्याबाबत शत्रुत्वाची भावना ठेवली आहे. हे आजच्या पिढीने जाणायला हवे. ते इतिहासात लपून ठेवले आहे.

योजना 100 टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे हे भाजपच्या कार्यशैलीचे उदाहरण- पंतप्रधान

कोरोनाच्या काळात योजना राबविण्यात सहभाग नोंदविल्याने पंतप्रधानांनी नागरिकांचे अभिनंदन केले. तसेच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे कौतुक केले. योजना ही 100 टक्के लाभापर्यंत पोहोचणे हे भाजपच्या कार्यशैलीचे उदाहरण आहे.

125 कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले - पंतप्रधान नरेंद्र मोदी

100 वर्षांतून एकदा येणारी महामारी आली आहे. मागील सरकार असते तर असे झाले असते का? 125 कोटींहून अधिक देशात लसीकरण झाले असते का, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. गोवा सरकारने 100 कोरोना लसीकरण केल्याबद्दल त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अभिनंदन केले. लशींसाठी 30 ते 40 वर्षे हे विदेशावर अवलंबून राहावे लागत होते. देश

भाजपच्या कार्यकाळात गोव्यातील पर्यटकांच्या संख्येत वाढ- पंतप्रधान नरेंद्र मोदी

भाजप सरकारने पर्यटनाला प्रोत्साहन दिले. त्यामुळे 365 दिवस पर्यटक येत आहेत. 2021 साली 25 लाख पर्यटक गोव्यात येत होते. 2019 साली भाजप सरकारमध्ये पर्यटकांची संख्या 1 कोटीहून अधिक झाली आहे. पायाभूत सुविधांचा गोव्याला फायदा होत आहे. येथे पर्यटक असल्याने गोवेकरांना लाभ होत आहे. तरुणांना रोजगाराच्या संधी मिळत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

दिल्लीच्या तख्तावर बसून त्यांना केवळ गोव्यात फिरण्यासाठी आठवण येत होती, पंतप्रधानांचा काँग्रेसला टोला

पाच दशक राज्ये केली. पण दिल्लीच्या तख्तावर बसून त्यांना गोव्याची विकासासाठी आठवण येत नव्हती. फिरण्यासाठी ते येत होते. देशात पर्यटन वाढविण्यासाठी गोव्यात पर्यटन वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी 5 हजार कोटींची सागरमाला प्रकल्प तयार होत असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

3 हजार कोटी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू - पंतप्रधान मोदी

3 हजार कोटी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम आहे. त्यामुळे पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल. व्यापार आणि इतर उद्योगांना चालना मिळेल. भाजपने जे काम केले आहे, त्याची अनेक दशंकापासून गोव्याला गरज होती. मांडवीय नदीवर अटल ब्रिजचे काम गोवा सरकारने केले आहे.

गोव्याची खास संस्कृती आणि ओळख - पंतप्रधान मोदी

काँग्रेसमुक्त कोट्यवधी नागरिकांचा संकल्प झाला आहे. गोव्याची खास संस्कृती आणि ओळख आहे. दक्षिण गोव्याप्रमाणे उत्तर गोव्यचाही विकास होईल, अशी पंतप्रधान मोदींनी ग्वाही दिली आहे.

पणजी- काँग्रेसमुक्त कोट्यवधी नागरिकांचा संकल्प झाला आहे. गोव्याची खास संस्कृती आणि ओळख आहे. दक्षिण गोव्याप्रमाणे उत्तर गोव्यचाही विकास होईल, अशी पंतप्रधान मोदींनी ग्वाही दिली आहे.

19:03 February 10

जवाहरलाल नेहरु यांनी गोव्याच्या मुक्तीकरिता सैनिक पाठविण्यास नकार दिला होता - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गोव्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी देव बोडगेश्वर मंदिरात दर्शन घेतले होते.

Last Updated :Feb 10, 2022, 10:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.