ETV Bharat / bharat

Triple Talaq : लग्नाच्या 30 वर्षांनंतर पतीने पत्नीला दिला तिहेरी तलाक; 'हे' आहे कारण

author img

By

Published : Aug 2, 2022, 4:15 PM IST

Updated : Aug 2, 2022, 7:12 PM IST

triple talaq case Lucknow
लखनौ तिहेरी तलाक प्रकरण

लखनौमधून तिहेरी तलाकचे प्रकरण ( Triple Talaq case in Lucknow ) समोर आले आहे. जिथे लग्नाच्या 30 वर्षांनंतर पतीने पत्नीला तिहेरी तलाक देऊन ( Triple Talaq after 30 years of marriage ) घरातून हाकलून दिले. न्याय मिळवण्यासाठी पीडितेने राजधानीतील हजरतगंज पोलिस ठाणे गाठले; परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही.

लखनौ: भारतात तिहेरी तलाकची प्रकरणे ( Triple Talaq case in Lucknow ) संपण्याचे नाव घेत नसल्याचे जाणवतेय. राजधानी लखनौमधील हजरतगंज येथील ताजे प्रकरण आहे. जिथे लग्नाच्या 30 वर्षांनंतर तरुणाने तिहेरी तलाक देऊन ( Triple Talaq after 30 years of marriage ) पत्नीला घराबाहेर काढले. यानंतर पीडितेने हजरतगंज पोलिस ठाणे गाठून ( victim approached Hazratganj police station ) न्यायाची याचना केली; मात्र पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कायदा आणि सुव्यवस्थेबाबत नियमित बैठका घेत आहेत. त्यानंतरही अशी प्रकरणे समोर येत असल्याने कुठेतरी समाजाच्या विचारसरणीवर प्रश्न उपस्थित होत आहे.

राजधानीतील हजरतगंज कोतवाली भागात राहणाऱ्या एका महिलेने पतीवर तिहेरी तलाकचा खळबळजनक आरोप केला आहे. पीडितेचा आरोप आहे की, पतीने तिला आधी मारहाण केली आणि नंतर तिहेरी तलाक दिला. अनेकवेळा पोलिस ठाण्यात जाऊनही पोलिसांनी पीडित महिलेची तक्रार नोंदवून घेतली नाही.

हजरतगंज कोतवाली भागातील रहिवासी जेबा इलाही यांनी सांगितले की, 30 मे 1991 रोजी तिचे अनवर इलाहीसोबत लग्न झाले होते आणि त्यांना 3 मुले आहेत. ती कोतवाली भागातील २५ टिळक मार्ग लखनौ येथील रहिवासी आहे. यावर्षी जानेवारी २०२२ मध्ये अन्वर इलाहीने जेबा इलाहीला घराबाहेर काढले. जेव्हा जेबा इलाही बहराइचमध्ये तिच्या वडिलांच्या घरी गेली होती. काही दिवसांनी मोठ्या मुलीचा बोर्डाचा पेपर असल्याने तिला परत येऊन लखनौमध्ये भाड्याचे घर घ्यावे लागले.

पीडितेचा आरोप आहे की, तिचा पती रोज दारूच्या नशेत घरी यायचा आणि तिला मारहाण करत असे. तो अश्लील शिवीगाळ करत तिचा मानसिक छळ करत असे. पीडिता शरमेने गप्प राहिली; पण पाणी डोक्यावर गेल्यावर पीडितेने प्रतिकार केला.

हेही वाचा - ED raids two places in Mumbai: मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीकडून दोन ठिकाणी छापेमारी

Last Updated :Aug 2, 2022, 7:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.