ETV Bharat / bharat

Congress Leader Joins BJP: काँग्रेसला मोठा झटका, माजी मुख्यमंत्र्याने केला भाजपमध्ये प्रवेश.. समीकरणे बदलणार

author img

By

Published : Apr 7, 2023, 3:41 PM IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किरणकुमार रेड्डी यांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. किरणकुमार रेड्डी यांच्या प्रवेशामुळे आंध्रप्रदेशात अनेक समीकरणे बदलणार आहेत.

Ex-Andhra CM Kiran Kumar Reddy joins BJP weeks after quitting Congress
काँग्रेसला मोठा झटका, माजी मुख्यमंत्र्याने केला भाजपमध्ये प्रवेश.. समीकरणे बदलणार

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाला आंध्रप्रदेशात आणखी एक धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एक दिवसापूर्वी माजी संरक्षण मंत्री एके अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

संयुक्त आंध्रचे शेवटचे मुख्यमंत्री: शुक्रवारी भाजप नेते आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी त्यांना भाजपचे सदस्यत्व मिळवून दिले. रेड्डी यांनी १२ मार्च रोजीच पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर रेड्डी भाजपात प्रवेश करणार आहेत अशी चर्चा होती. संयुक्त राज्य आंध्र प्रदेशचे किरण कुमार रेड्डी हे शेवटचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळानंतर राज्याचे विभाजन होऊन तेलंगणाच्या रूपाने नवीन राज्याचा जन्म झाला होता.

आता तुम्हाला समजेल: किरण रेड्डी म्हणाले की, मी काँग्रेस सोडेन असे कधीच वाटले नव्हते, पण त्यांना पक्ष सोडावा लागला. एका म्हणीचा संदर्भ देत ते म्हणाले, 'माझा राजा खूप हुशार आहे, तो स्वत:चा विचार करत नाही. आणि तो कोणाचाही सल्ला ऐकत नाही. रेड्डी म्हणाले की, आम्हाला काय म्हणायचे आहे ते आता तुम्हाला समजले असेल.

स्वतःचा पक्षही काढला होता: किरण रेड्डी यांनी यापूर्वीच काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. आंध्र प्रदेशचे विभाजन झाले तेव्हाही त्यांनी यूपीए सरकारच्या निर्णयाला विरोध करत पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी स्वतःचा पक्ष काढला. त्याचे नाव जय समैक्य आंध्र पार्टी होते. पण 2018 मध्ये ते काँग्रेसमध्ये परतले.

काँग्रेस नेते म्हणाले, त्यांनी पक्ष कमकुवत केला: रेड्डी यांच्या या राजीनाम्यावर काँग्रेस नेत्याने तिखट प्रतिक्रिया दिली. काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य मणिकम टागोर म्हणाले की, जे लोक पक्षाकडून सर्व काही घेतात ते वेळ आल्यावर पक्ष सोडून जातात. टागोर म्हणाले की, किरण रेड्डी यांनी काँग्रेसला काहीही दिले नाही, तर पक्ष अधिक कमकुवत केला.

हेही वाचा: तेलंगणात मोदींच्या दौऱ्याच्या आधी वातावरण तापले, अटकेतील बंदी संजय यांना जामीन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.