ETV Bharat / bharat

sexual Abuse : चिंताजनक ! दररोज चार मुलींचे होते लैंगिक शोषण ; आरटीआयचा खुलासा

author img

By

Published : Dec 19, 2022, 12:47 PM IST

उत्तर प्रदेशातील 48 जिल्ह्यांमध्ये दररोज 4 लैंगिक शोषणाचे गुन्हे ( sexual Abuse crime ) नोंदवले जातात. बाल कार्यकर्ते नरेश पारस ( Naresh Paras ) यांनी दाखल केलेल्या माहितीच्या अधिकारात हा धक्कादायक खुलासा झाला आहे. ( Every Day 4 Girls Are Molested In Up )

Molested  Many Districts
लैंगिक शोषण

चिंताजनक ! दररोज चार मुलींचे होते लैंगिक शोषण ;आरटीआयचा खुलासा

आग्रा : ताजनगरीतील मुलींनसाठी दक्षतेने काम करणारे बाल कार्यकर्ते नरेश पारस यांनी सरकारकडे मागवलेल्या आरटीआयला मिळालेल्या उत्तराने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. बाल कार्यकर्ते नरेश पारस यांनी पोलीस अधीक्षक, स्टेट क्राईम रेकॉर्ड, लखनौ यांच्याकडे 2015 ते 2021 या कालावधीत मुलांच्या वयानुसार लैंगिक अत्याचाराच्या ( sexual Abuse crime ) प्रकरणांची माहिती आरटीआयद्वारे मागितली होती. राजधानी लखनऊसह सुमारे 48 जिल्ह्यांचा डेटा संकलित केल्यानंतर कार्यालयाने कार्यकर्ते नरेश पारस ( Naresh Paras ) यांना उत्तर पाठवले आहे. ( Every Day 4 Girls Are Molested In Up )

दररोज 4 मुले अत्याचाराच्या बळी : गेल्या 7 वर्षांत मुलांवर लैंगिक अत्याचाराच्या नोंदीनुसार 11,902 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. त्यानुसार दररोज 4 मुली लैंगिक अत्याचाराला बळी ठरताता. हा डेटा राजधानी लखनऊसह 48 जिल्ह्यांचा आहे, ज्यामध्ये 27 जिल्ह्यांचा डेटा गायब आहे. या आरटीआयनंतर असा अंदाज लावला जाऊ शकतो की मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये दरवर्षी वाढ होत आहे.

लखनऊ पहिल्या क्रमांकावर : लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये लखनऊ पहिल्या क्रमांकावर आहे. 48 जिल्ह्यांचा डेटा संकलन आहे, त्यानुसार राजधानी लखनऊ गेल्या 7 वर्षांत मुलांच्या वयानुसार लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये पहिल्या स्थानावर आहे. लखनौमध्ये 800 हून अधिक खटले, दुसऱ्या क्रमांकावर पिलीभीतमध्ये 750, तिसऱ्या क्रमांकावर बिजनौरमध्ये 589 आणि महाराजगंजमध्ये 489 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बेपत्ता मुलांची नोंद : आग्रा जिल्ह्यातील आकडेवारीनुसार, गेल्या 2 महिन्यांत 85 बेपत्ता मुलांची नोंद झाली आहे. ज्यामध्ये बहुतेक प्रकरणे प्रेमप्रकरणात फूस लावून लैंगिक शोषण केलेले आहे. तर मुली अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले.आतापर्यंत केवळ २६ मुलींनाच ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. बाल कार्यकर्त्याच्या म्हणण्यानुसार, जिल्ह्यात मुलींच्या लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, त्याची पोलिसांकडून नोंद होत नाही आणि ही चिंतेची बाब आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.