ETV Bharat / bharat

Bilaspur Kidney Theft : किडनी चोरीच्या आरोपावरून जिल्हाधिकाऱ्यांनी मृतदेह काढला बाहेर

author img

By

Published : May 18, 2023, 9:41 PM IST

Bilaspur Kidney Theft
Bilaspur Kidney Theft

21 एप्रिल रोजी छत्तीसगडमधील बिलासपूर येथे झालेल्या अपघातात जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नातेवाईकांनी रुग्णालयातील डॉक्टरांवर किडनी चोरल्याचा आरोप केला. तब्बल 25 दिवसांनंतर बुधवारी दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलिसांनी कबर खोदून मृतदेह बाहेर काढला. गुरुवारी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर धक्कादायक खुलासा झाला आहे.

राहुल अग्रवाल यांची प्रतिक्रिया

बिलासपूर : जिल्ह्यातील एका वृद्धाचा रस्ता अपघातात 21 एप्रिल रोजी मृत्यू झाला होता. आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. मृत्यूनंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी मृताची किडनी बाहेर काढल्याचा आरोप नातेवाईकांनी रुग्णालय व्यवस्थापनावर केला होता. मात्र, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये कुटुंबीयांचे आरोप निराधार असल्याचे घोषित करण्यात आले. या प्रकरणी मृताच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीसाठी तक्रार केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी वृद्धाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचे निर्देश दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर पाचपेडी पोलिसांनी महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढला. नंतर सिम्स मेडिकल कॉलेजमध्ये त्याचे शवविच्छेदन केले.

महिनाभरापूर्वी घडली घटना : मस्तुरी ब्लॉकमधील पाचपेडी पोलीस स्टेशन हद्दीतील सोन गावात राहणारे धरमदास माणिकपुरे हे 14 एप्रिल रोजी सावरीदेरा गावात त्यांचा मुलगा दुर्गेशदास माणिकपुरी याच्या लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी गेले होते. वाटेत कारने दुचाकीला धडक दिली होती. दोघोही अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे दोघांना पामगढ सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना सिम्स बिलासपूर येथे रेफर करण्यात आले. कुटुंबीयांनी जखमींना बिलासपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने वृद्ध धरमदास यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मुलाच्या पायावरही हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

नातेवाईकांची तक्रार : 15 एप्रिलच्या रात्री दोन्ही रुग्णांना रुग्णालयात दाखल केले होते. तर 21 एप्रिल रोजी वृद्ध धरमदास यांचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर नातेवाईक धरमदासचा मृतदेह घेऊन घरी गेले. तेव्हा त्यांच्यावर शस्त्रक्रिया किडनीजवळ उजव्या बाजूला झाल्याचे दिसले. त्यानंतर त्यांच्या शरीरातून किडनी काढल्याचा नातेवाईकांना संशय आला. याप्रकरणी मृताच्या मुलाने बिलासपूर जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. रस्ता अपघातात जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर मृताच्या मुलांनी डॉक्टरांवर आरोप केले.

दोन्ही किडनी शरीरात सुरक्षित : जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर तपास सुरू करण्यात आला. 25 दिवसांनंतर बुधवारी दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलिसांनी कबर खोदून धरमदासचा मृतदेह बाहेर काढला. गुरुवारी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनानंतर लहान पीएम अहवालात दोन्ही किडन्या शरीरातच सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. सिम्स मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी सांगितले की, सरकारी आदेशाची प्रत पोलिसांनी त्यांच्याकडे सोपवली असून, व्हिडिओग्राफीसह मृताचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे. दोन्ही किडनी शरीरात सुरक्षित असून किडनी चोरीचा प्रश्नच उद्भवत नाही. दोन्ही किडनी मृताच्या नातेवाईकांना दाखवण्यात आल्या आहेत.

किडनीजवळ ऑपरेशनच्या जखमा : उजव्या बाजूला किडनीजवळ केलेल्या ऑपरेशनच्या जखमा पाहून या ठिकाणाहून किडनी काढण्यात आल्याचा संशय नातेवाईकांना आला. परंतु वैद्यकीय शास्त्राच्या नियमांनुसार डोक्याचे ऑपरेशन करताना पोटाच्या बाजूला असलेल्या किडनीजवळ ऑपरेशन करून डोक्याचे काढलेले हाड सुरक्षित राहून शरीराचे तापमान राखले जाते.

'शस्त्रक्रियेनंतर, डोक्यातून काढलेले हाड त्या जागी ठेवले जाते. जेणेकरून जेव्हा रुग्ण उपचारानंतर बरा होऊ लागतो, तेव्हा ते हाड शरीराच्या आतून बाहेर काढले जाते. पुन्हा डोक्यात ठेवले जाते. यामुळे ते खराब होत नाही, कारण ते शरीराच्या तापमानात राहते." - डॉ. राहुल अग्रवाल, सिम्स मेडिकल कॉलेज

मुलाने उपस्थित केले प्रश्न : मृत धरमदास यांचा मुलगा सोमदास याने अद्यापही या संपूर्ण प्रकरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. सोमदास सांगतात की, जेव्हा त्यांच्या वडिलांचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला, तेव्हा त्यांना वेगवेगळ्या कागदपत्रांवर सह्या करायला लावल्या. मात्र, आता त्यांच्या मृत्यूचा दाखला मागितल्यावर त्यांच्या वडिलांचा रुग्णालयात मृत्यू झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. वडिलांना रुग्णालयातून स्वत:च्या जबाबदारीवर घेऊन जात असल्याचे तुम्हीच लिहिले आहे, असेही त्याला सांगण्यात येत आहे.

"वडील मेले नसते तर त्यांना घरी कसे नेले असते. जर ते जिवंत असते तर त्यांना कबरीत कसे पुरले असते." - सोमदास

किडनी दाखवली, मात्र विश्वास बसत नाही : शवविच्छेदनानंतर डॉक्टरांनी दोन्ही किडन्या मृताच्या नातेवाईकांना दाखवल्या. यावर धरमदास यांचा मुलगा सोमदास याने सांगितले की, डॉक्टरांनी त्यांना किडनी दाखवली होती. वडिलांच्या शरीरात दोन्ही किडन्या होत्या. पण आयुष्यात पहिल्यांदाच मानवी शरीराची किडनी पाहिली आहे, असा प्रश्नही सोम दास यांनी उपस्थित केला. म्हणूनच त्याला जे दाखवले आहे तेच किडनी आहे यावर त्याचा विश्वास बसत नाही.

हेही वाचा -

  1. J P Nadda On Skill Development : युवकांसाठी कौशल्य विकास ही काळाची गरज- जे. पी. नड्डा
  2. Honeymoon : हनिमूनला पतीने टाकली 'ही' घृणास्पद अट, लग्नाच्या तीन महिन्यांनंतरही नवरी हनिमुनविनाच
  3. Karnataka New CM : सिद्धरामैय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदी शिवकुमार; 20 तारखेला शपथविधी सोहळा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.