ETV Bharat / bharat

जेडीयूने 15 बंडखोर नेत्यांना पक्षातून काढले, ६ वर्षासाठी 'नो एन्ट्री'

author img

By

Published : Oct 13, 2020, 6:46 PM IST

निवडणुकीसाठी तिकीट न मिळाल्याने नेते नाराज होते. आता पक्षाने काढून टाकल्यानंतर यातील काही नेते इतर पक्षातून निवडणूक लढत आहेत. तर काही नेते इतर पक्षांना मदत करत असल्याचा आरोप होत आहे.

जेडीयू
जेडीयू

पटना- जेडीयूने १५ बंडखोर नेत्यांना ६ वर्षासाठी पक्षातून बाहेर काढले आहे. पक्षाविरोधात होणाऱ्या कारवायांमध्ये या नेत्यांचा सहभाग असल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

निवडणुकीसाठी तिकीट न मिळाल्याने हे नेते नाराज होते. आता पक्षाने काढून टाकल्यानंतर यातील काही नेते इतर पक्षातून निवडणूक लढत आहेत. तर काही नेते इतर पक्षांना मदत करत असल्याचा आरोप होत आहे.

..या नेत्यांना काढण्यात आले

रामेश्वर पासवान, प्रमोद चंद्रवंशी, अरुण कुमार, तजम्मल खा, अमरेश चौधरी, शिवशंकर चौधरी, सिंधू पासवान, करतार सिंह, राकेश रंजन, ददन पहलवान, सुमित सिंह, भगवान सिंह कुशवाह, रणविजय सिंह, कंचन गुप्ता आणि मुंगेही पासवान यांना ६ वर्षासाठी पक्षातून काढण्यात आले आहे.

हेही वाचा- एम. जे. अकबर मानहानी खटला दुसऱ्या न्यायालयात हलवण्याचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.