ETV Bharat / bharat

जैशच्या वाँटेड दहशतवाद्याला अटक, स्पेशल सेलची कारवाई

author img

By

Published : Apr 1, 2019, 11:51 PM IST

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दले आणि तपास यंत्रणांनी जैश-ए-मोहम्मद विरोधातील आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. १४ फेब्रुवारीच्या हल्ल्यानंतर जैशच्या अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. जैशचे 'नेटवर्क' संपविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न सुरु आहेत.

फैय्याज अहमद लोन

नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांनी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथून जैश-ए-मोहम्मदचा वाँटेड दहशतवादी फैय्याज अहमद लोनला अटक केली आहे. पोलिसांच्या स्पेशल सेलने ही कारवाई केली. त्याच्यावर दिल्ली पोलिसांनी दोन लाखाचे इनाम ठेवले होते. त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते. साल २०१५ पासून तो अटक टाळण्यासाठी पोलिसांना चकवा देत होता.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दले आणि तपास यंत्रणांनी जैश-ए-मोहम्मद विरोधातील आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. १४ फेब्रुवारीच्या हल्ल्यानंतर जैशच्या अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. जैशचे 'नेटवर्क' संपविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न सुरु आहेत.

१४ फेब्रुवारीला जैशच्या आत्मघातकी हल्लेखोराने पुलवामा येथे स्फोटकांनी भरलेल्या कारसह सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाण्याऱ्या बसला धडक दिली होती. यामुळे झालेल्या स्फोटात भारताच्या ४० जवानांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर २६ फेब्रुवारीला भारतीय हवाई दलाने जैश-ए-मोहम्मदच्या पाकिस्तान बालकोटमधील तळावर एअर स्ट्राइक केला. ज्यामध्ये अनेक दहशतवादी, त्यांच्या ट्रेनर्सचा खात्मा झाला.

Intro:Body:

जैशच्या वाँटेड दहशतवाद्याला अटक, स्पेशल सेलची कारवाई

नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांनी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथून जैश-ए-मोहम्मदचा वाँटेड दहशतवादी फैय्याज अहमद लोनला अटक केली आहे. पोलिसांच्या स्पेशल सेलने ही कारवाई केली. त्याच्यावर दिल्ली पोलिसांनी दोन लाखाचे इनाम ठेवले होते. त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते. साल २०१५ पासून तो अटक टाळण्यासाठी पोलिसांना चकवा देत होता.



पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दले आणि तपास यंत्रणांनी जैश-ए-मोहम्मद विरोधातील आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. १४ फेब्रुवारीच्या हल्ल्यानंतर जैशच्या अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. जैशचे  'नेटवर्क' संपविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न सुरु आहेत.



१४ फेब्रुवारीला जैशच्या आत्मघातकी हल्लेखोराने पुलवामा येथे स्फोटकांनी भरलेल्या कारसह सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाण्याऱ्या बसला धडक दिली होती. यामुळे झालेल्या स्फोटात भारताच्या ४० जवानांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर २६ फेब्रुवारीला भारतीय हवाई दलाने जैश-ए-मोहम्मदच्या पाकिस्तान बालकोटमधील तळावर एअर स्ट्राइक केला. ज्यामध्ये अनेक दहशतवादी, त्यांच्या ट्रेनर्सचा खात्मा झाला.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.