ETV Bharat / bharat

Bihar: बिहारमध्ये विषारी दारूमुळे मृत्यूचे तांडव.. ४ दिवसात १३ जणांचा मृत्यू..

author img

By

Published : May 26, 2022, 9:46 AM IST

बिहारमधील विषारी दारूमुळे होणारे मृत्यू थांबण्याचे नाव घेत नाही आहेत. तीन जिल्ह्यांत गेल्या चार दिवसांत बनावट दारू पिऊन आतापर्यंत १३ जणांना जीव गमवावा लागला ( 13 died due to Spurious liquor in Bihar ) आहे. दारूबंदी कडक असतानाही बनावट दारूमुळे लोकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली ( Spurious liquor in Bihar ) आहे. पूर्ण बातमी वाचा..

बिहारमध्ये विषारी दारूमुळे मृत्यूचे तांडव
बिहारमध्ये विषारी दारूमुळे मृत्यूचे तांडव

पाटणा : बिहारमध्ये विषारी दारू प्यायल्याने मृत्यूची प्रकरणे सुरूच आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत बनावट दारूमुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी, गेल्या चार दिवसांत मधेपुरामध्ये दोन, गयामध्ये चार जणांचा मृत्यू झाला ( 13 died due to Spurious liquor in Bihar ) आहे. एकीकडे नातेवाईक दारू पिऊन मृत्यू झाल्याची कबुली देत ​​असताना दुसरीकडे या मृत्यूंनंतर पोलीस प्रशासनाने अवैध दारूविरोधात मोहीम राबवून छापे टाकण्यास सुरुवात केली ( Spurious liquor in Bihar ) आहे.

औरंगाबादमध्ये विषारी दारूमुळे 11 जणांचा मृत्यू : औरंगाबादमध्ये कथित दारूमुळे मंगळवारी तीन जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आणि स्थानिक चौकीदाराला निलंबित करण्यात आले आहे. यानंतर हा आकडा 11 वर पोहोचला. मदनपूर ब्लॉकच्या खिरियावान गावात 24 तासांत 7 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये स्वत: जिल्हा दंडाधिकारी सौरभ जोरवाल यांनी विषारी दारूमुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.

औरंगाबाद विषारी दारू प्रकरणावर मंत्री काय म्हणाले : दरम्यान, दारूबंदी मंत्री सुनील कुमार म्हणाले की, औरंगाबादमध्ये विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूबाबत पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. प्रथम तीन आणि नंतर 2 म्हणजे एकूण 5 जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली असून, त्यांची चौकशी सुरू आहे. सुनील कुमार म्हणाले की, आम्ही पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत आहोत.

गयामध्ये बनावट दारूमुळे ४ जणांचा मृत्यू झाला आहे. कैलास यादव असे चौथ्या मृताचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. अर्धा डझन लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, सोमवारी संध्याकाळी सर्वांनी दारू प्यायली, त्यानंतर सर्वांची प्रकृती ढासळू लागली. सोमवारी रात्री दोघांचा मृत्यू झाला. काही लोकांना मगध मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले आहे, तर काही लोकांना अमासमध्येच सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मधेपुरा येथे विषारी दारूमुळे मृत्यू : मधेपुरा जिल्ह्यातील चौसा पोलीस स्टेशन हद्दीतील घोसई येथील मधेपुरा येथे विषारी दारूमुळे मेहुण्याचा मृत्यू झाला. घटना रविवारची आहे. रविवारी रात्री सुबोध झा यांच्या घरी झालेल्या पार्टीत सरहसा येथे राहणारा जावई आलोक झा याने आपल्या मेव्हण्यासोबत विषारी दारू प्यायल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्याला सामुदायिक आरोग्य केंद्र चौसा येथे नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर आजारी सुबोध झा यांचा मुलगा अभिनव कुमार उर्फ ​​गोलू याचा सोमवारी दारू पिऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

हेही वाचा : Video : आंबे तोडण्याची भयानक शिक्षा, अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण.. अंगावर फेकले मधमाशांचे पोळे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.