महाराष्ट्र

maharashtra

साताऱ्याहून मुंबईला जाताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या वाहनाला अपघात, आठवले सुखरूप - Ramdas Athawale Car Accident

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 21, 2024, 8:19 PM IST

Ramdas Athawale Car Accident : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाहनाला पुणे बंगळुरू महामार्गावर अपघात झाला आहे. या अपघातात त्यांच्या वाहनाचं मोठं नुकसान झालं असलं तरी रामदास आठवले हे सुखरूप आहेत.

Ramdas Athawale Car Accident
रामदास आठवलेंच्या वाहनाला अपघात

सातारा Ramdas Athawale Car Accident : साताऱ्याहून मुंबईकडे जात असताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाहनाला कंटेनरनं धडक दिली. पुणे-बंगळुरू महामार्गावरील भुईंज (ता. वाई) हद्दीतील बोगद्यात ही घटना घडली आहे. या अपघातात आठवले यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं असून रामदास आठवले हे सुखरूप आहेत. तसंच दुसऱ्या वाहनानं ते मुंबईकडं रवाना झाले आहेत.



आठवलेंच्या गाडीचं मोठं नुकसान : घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे आपल्या वाहनानं साताऱ्याहून मुंबईकडं जात होते. पुणे-बंगळुरू महामार्गावर भुईंज (ता. वाई) गावच्या हद्दीतील बोगद्यात त्यांच्या मोटारीला एका कंटेनरनं जोऱ्यात धडक दिली. या अपघातात त्यांच्या गाडीचं मोठं नुकसान झाले. रामदास आठवले हे मात्र सुखरूप आहेत.

दुसऱ्या वाहनानं मुंबईकडं रवाना : अपघातानंतर रामदास आठवले हे दुसऱ्या वाहनानं मुंबईकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, रामदास आठवले यांच्या वाहनाला अपघात झाल्याचे समजताच आरपीआयच्या वर्तुळात खळबळ उडाल्याचं बघायला मिळालं.

हेही वाचा -

  1. Ramdas Athawale PC : नव्या मित्रांमुळे जुन्या मित्रांना विसरू नका, रामदास आठवलेंचा भाजपाला खोचक टोला
  2. "शाहू महाराजांनी हरण्यासाठी निवडणूक लढवू नये", रामदास आठवलेंचा सल्ला
  3. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणारच नाही, रामदास आठवले स्पष्टपणे बोलले

ABOUT THE AUTHOR

...view details