महाराष्ट्र

maharashtra

VIDEO : पटियाला संघर्षावर कॅबिनेट मंत्री वेरका यांची सरकारकडे शांतता समिती स्थापनेची मागणी

By

Published : Apr 29, 2022, 4:43 PM IST

पटियाळा (पंजाब) : माजी कॅबिनेट मंत्री राजकुमार वेरका म्हणाले की, पटियाला येथील घटनेने पंजाबची जनता पुन्हा हादरली आहे. पंजाबने याआधीच वाईट काळ पाहिला आहे. पंजाबमध्ये परस्पर बंधुभाव संपुष्टात येऊ देऊ नये. राजकुमार वेरका यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना ताबडतोब पटियाला येथे जाऊन शांतता समिती स्थापन करावी आणि धार्मिक संघटनांशी चर्चा करावी, असे म्हटले आहे. जेणेकरून आग पसरण्यापासून रोखता येईल, असेही आवाहन केले. ही आग पंजाबमध्ये रोखली नाही, तर त्यावर नियंत्रण मिळवणे आणखी कठीण होईल, असेही ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details