मुंबई - केंद्र सरकारचे सोमवारी (दि. 1 फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर झाले आहे. यानंतर शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळाली आहे. बजेटमधून सरकारने रोडमॅप दिला आहे. त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी केली तरच लोकांना याचा फायदा होईल, अशी प्रतिक्रिया शेअर मार्केटमधील गुंतवणूकदार सिद्धार्थ पुवावाला यांनी दिली आहे.