महाराष्ट्र

maharashtra

'वंदे भारत ट्रेन'मुळं पर्यटन, उद्योग व्यवसायाला मिळेल चालना; उद्योजकांनी व्यक्त केला विश्वास

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 30, 2023, 7:07 PM IST

वंदे भारत ट्रेन

छत्रपती संभाजीनगर Vande Bharat Train : जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ झाला. गेल्या अनेक दिवसांपासून गाडी कधी सुरू होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. शनिवारी गाडी धावताच व्यावसायिक आणि उद्योजकांनी आनंद व्यक्त केला. (Industry Business) यामुळे पर्यटन व्यवसाय आणि उद्योगांना चालना मिळेल अस विश्वास व्यक्त करण्यात आला. (Entrepreneur Opinion) दर्जेदार प्रवास करण्यासाठी विमानाचा पर्याय अनेक जण निवडतात, अशा प्रवाशांना रेल्वेचा पर्याय मिळाला असल्याने अनेकांच्या अडचणी दूर होतील, (Jalna Mumbai Travel) असा विश्वास उद्योजक विवेक देशपांडे आणि राम भोगले यांनी व्यक्त केला. वंदे भारत रेल्वेने प्रवास करणारे उद्योजक विवेक देशपांडे, माजी आमदार श्रीकांत जोशी, उद्योजक राम भोगले यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.

ABOUT THE AUTHOR

...view details