महाराष्ट्र

maharashtra

नांदेड येथे लग्न सोहळ्यातील जेवणातून २५० ते ३०० लोकांना विषबाधा

By

Published : Nov 23, 2021, 6:53 PM IST

Updated : Nov 23, 2021, 7:43 PM IST

नांदेड - लग्न सोहळ्यात जेवण केल्याने तब्बल तीनशे लोकांना विषबाधा झाल्याची खळबळ जनक घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. कंधार तालुक्यातील दिग्रस गावात हा लग्न सोहळा 21 नोव्हेंबर रोजी पार पडला. या कार्यक्रमात जेवण केलेल्या जवळपास २५० ते ३०० लोकांना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. उलट्या आणि मळमळ होत असल्याची लक्षने या रुग्णांना जाणवत आहे. कंधार येथील शासकीय रुग्णालयात विषबाधा झालेल्या रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. सध्या रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
Last Updated : Nov 23, 2021, 7:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details