वाशिम जिल्ह्यातील आडोळ प्रकल्प ओव्हरफ्लो; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
मागील 15 दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. मालेगाव तालुक्यातील आडोळ प्रकल्प देखील ओव्हरफ्लो झाल्यामुळे रिसोड शहरासह इतर गावांचा पिण्याच्या पाण्याच प्रश्न सुटला आहे.
![वाशिम जिल्ह्यातील आडोळ प्रकल्प ओव्हरफ्लो; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण Aadol project overflow](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8445445-1030-8445445-1597614079303.jpg)
आडोळ प्रकल्प ओव्हफ्लो
वाशिम-जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील अनेक प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. यामध्ये मालेगाव तालुक्यातील बोराळा येथील आडोळ प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. शेतीसाठी पाण्याची सोय झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आडोळ प्रकल्पातून रिसोड शहरासह, शिरपूर, रिठद गावाला पाणी पुरवठा करण्यात येतो.
आडोळ प्रकल्प ओव्हरफ्लो