पुणे:महाविकास आघाडीची रविवारी संभाजीनगरमध्ये सभा झाली. या सभेत वज्रमुठ घेऊन ते तिघे एकत्र आलेले आहेत. काळाच्या ओघांमध्ये या वज्रमुठीचा वापर एकमेकांच्या विरोधात पाडण्यासाठी होऊ नये म्हणजे झालं, अशी खोचक टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. उद्धव ठाकरे दोन अडीच वर्षाच्या काळानंतर बाहेर पडले नाही. तर त्यांना लोक फेसबुकवरच भेटायचे. त्यामुळे त्या मुठीचा योग्य वापर व्हावा, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
बोलताना भान ठेवावे: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक विश्वव्यापी नेतृत्व आहे. मोदीच्या छत्रीच्या खाली उद्धव ठाकरे, शिवसेना मोठी झाली आहे. याचे भान त्यानी ठेवले पाहिजे. त्यांनी बोलताना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि भाजपबरोबर जुने नाते, याचे भान ठेवावे अशीही टीका सुद्धा राधाकृष्ण विखे पाटलांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. फार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या प्रभावाखाली येऊन स्वतःचे नुकसान करून घेऊ नये, असा सल्ला उद्धव ठाकरे यांना राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.
महाराष्ट्राला फार अपेक्षा नाही:भविष्यात शिवसेना-भाजप उद्धव ठाकरे याबाबत विचारे असता, एक तर उद्धव ठाकरे यांच्या हातात काही राहिले नाही. त्यांचे रिमोट कंट्रोल दुसरे आहेत. हिंदुत्वाच्या विचारांशी फारकत घेतलेल्या नेत्याकडून आता महाराष्ट्राला फार अपेक्षा नाही. मुख्यमंत्री असतानाच्या काळात त्यांच्या देवभक्ती आणि देशभक्ती करणाऱ्या लोकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून जास्त काही अपेक्षा नाही, अशी टीका विखे पाटलांनी दिली आहे. त्यांच्या पक्षाची झालेली वाताहात त्याच्यातून निघून गेलेली नेते त्यामुळे हा आक्रोश आहे. हिंदुत्ववादी सरकार आहे असे सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.