महाराष्ट्र

maharashtra

पालघरमध्ये दोन बसचा भीषण अपघात; 50 प्रवासी जखमी

By

Published : Sep 10, 2021, 3:41 PM IST

bus accident in palghar; 50 injured

विक्रमगडहून वाड्याच्या दिशेने जाणारी डहाणू-ठाणे आणि वाड्याहून येणारी जव्हार-वाडा या दोन बस आलोंडे, कोकणीपाडा समोरासमोर धडकून भीषण अपघात घडला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र दोन्ही बस मधील जवळ-जवळ 50 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

पालघर - विक्रमगड तालुक्यातील आलोंडे येथे दोन बसची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही दोन्ही बसमधील 50 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

पालघरमध्ये दोन बसचा भीषण अपघात

50 प्रवाशी जखमी -

विक्रमगडहून वाड्याच्या दिशेने जाणारी डहाणू-ठाणे आणि वाड्याहून येणारी जव्हार-वाडा या दोन बस आलोंडे, कोकणीपाडा समोरासमोर धडकून भीषण अपघात घडला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र दोन्ही बस मधील जवळ-जवळ 50 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसमधील जखमी प्रवाशांना तातडीने वाडा येथील रुग्णालयात हलवण्यात आले व जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा -गणेशोत्सवात मुंबई मनपाची नवी नियमावली, माझं घर माझा गणपती धोरण राबवण्याचे आवाहन

ABOUT THE AUTHOR

...view details