महाराष्ट्र

maharashtra

कायदा व सुव्यवस्था कोणी बिघडवत असेल सरकार ते खपवून घेणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवारांची तंबी

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 8, 2024, 8:04 AM IST

Ajit Pawar News : सध्या राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरुन विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहेत. अशातच कायदा व सुव्यवस्था कोणी बिघडण्याचा काम करत असेल तर सरकार ते खपवून घेणार नसल्याची तंबी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलीय.

DCM Ajit Pawar
DCM Ajit Pawar

उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई Ajit Pawar News : कुख्यात गॅंगस्टार शरद मोहोळ याच्या हत्येनंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरुन विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका होत आहे. यावर राज्यातील कायदा व सुव्यवस्था कोणी बिघडण्याचा काम करत असेल तर सरकार ते खपवून घेणार नाही, अशी तंबी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलीय. ते मुंबईत रविवारी माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.


जरांगे पाटलांना टोला : मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात रान उठवलंय. आरक्षणावरुन ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध थांबायला तयार नाही. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही, अशाप्रकारचं वक्तव्य मनोज जरांगे पाटील करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार मराठा नेत्यांची कामं करत नाही, मराठा समाजावर अन्याय करत असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला होता. याला उत्तर देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "मला माझं माहित आहे की, मी काय काम करतो. मला दुसऱ्यानं पावती देण्याची गरज नाही. गेली 32 वर्षे झाले मी काम करतो." सर्व धर्मांची मी कामं करत असल्याचे म्हणत अजित पवारांनी जरांगे पाटलांना टोला लगावलाय.


राज ठाकरेंना प्रत्युत्तर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सागरी सेतूवरुन राज्य सरकारवर टीका केली. यावर अजित पवार म्हणाले की, "समृध्दी महामार्ग महामार्गावरून फायदा झाला. एक्स्प्रेस वे फायदा झाला आहेत. यातून वेळेची बचत होते. पेट्रोलचीही बचत होते. तसंच या सेतूमुळं वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे."


जनतेचे प्रश्न सोडवण्यावर भर :मी माझं काम करत असतो. मी कामाला महत्त्व देतो, अशा बारीक गोष्टींवर लक्ष ठेवण्याचं आपलं काम नसल्याचं म्हणत त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. तसंच जनतेच्या प्रश्न सोडवणं आणि राज्यातील विकास कामावर भर देण्याला आपण प्राधान्य देत असल्याचं त्यांनी म्हटलंय.



हेही वाचा :

  1. पक्ष संपवायला बाहेरच्या लोकांची गरज नाही, भुजबळांची नाव न घेता आव्हाडांवर टीका
  2. आता ८० वर्षाच्या व्यक्तींनी मार्गदर्शन करावे, अजित पवारांचा शरद पवारांना टोला
  3. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची अमित शाहांसोबत आजची भेट रद्द; कधी होणार पुढील भेट?

ABOUT THE AUTHOR

...view details