महाराष्ट्र

maharashtra

Sanjay Raut on Refinery Project: कोकणात दुसरे जालियनवाला हत्याकांड होऊ शकते...संजय राऊत यांचा गंभीर आरोप

By

Published : Apr 25, 2023, 12:14 PM IST

रत्नागिरीतील वादग्रस्त प्रकल्प रिफायनरीसाठी सध्या जागेचे सर्वेक्षण करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र, या सर्वेक्षणाला रत्नागिरीतील स्थानिक नागरिकांनी व पर्यावरण प्रेमी संघटनांनी विरोध दर्शवला आहे. रत्नागिरीतील बारसू या गावात स्थानिक नागरिक व पर्यावरण प्रेमी संघटना आंदोलनाला बसल्या आहेत. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या नागरिकांना पोलीस बळाचा वापर करून धमकावले जात आहे, असा आरोप तिथल्या स्थानिकांनी केला आहे. तर, हे लोकं मागे न हटल्यास तिथे पोलिसांच्या मदतीने भविष्यात दुसरे जालियनवाला हत्याकांड होऊ शकतो. असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते मुंबईतील आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.

Sanjay Raut on Refinery Project
संजय राऊत

जालियनवाला बाग हत्याकांडाप्रमाणे बारसुचे देखील हत्याकांड होऊ शकते- संजय राऊत

मुंबई :रिफायनरीबाबत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, या प्रकल्पाला लोकांचा विरोध आहे. स्थानिकांचा विरोध आहे. कालपासून साधारण पाच ते सहा हजार लोक त्या बारसूच्या माळरानावर जमलेली आहेत. आम्ही मरु गोळ्या खाऊ पण इथून हटणार नाही, अशी या स्थानिकांची भूमिका आहे. असे असताना या राज्याचे उद्योगमंत्री ज्याप्रमाणे खारघर हत्याकांड घडवून आणले, तसे तुमच्यावर गोळ्या घालू अशा धमक्या स्थानिकांना देत आहेत. साधारण 5 ते 6 हजार लोक आज त्या माळरानावर आंदोलन करत आहेत. अनेक कुटुंब परगंधा झाली आहेत. अनेकांना पोलीस ठाण्यात 24 तास चौकशीच्या नावाखाली बसवून ठेवुन धमक्या दिल्या जात आहेत.


पोलीस दारावर लाथा मारत आहेत :पुढे बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, पोलिसांनी हजारो नागरिकांना तडीपारीच्या नोटीस दिल्या आहेत. इतकेच नव्हे बारसु, राजापूर येथील जे रहिवासी मुंबईत वास्तव्याला आहेत, त्यांना सुद्धा धमक्या दिल्या जात आहेत. पोलीस मुंबईत त्यांच्या घरी जाऊन दारावर लाथा मारून धमक्या देत आहेत. मुंबईत सुद्धा बारसु वासीयांना अटक केली जात आहे. हे अत्यंत विकृत आणि दहशदवादी मनोवृत्तीचे सरकार आहे. मला असे वाटते, त्या माळरानावर बसलेले हजारो विरोधक मागे हटले नाही. तर, त्यांच्यावर गोळ्या चालवल्या जातील. त्यामुळे जालियनवाला बाग हत्याकांडाप्रमाणे बारसुचे देखील हत्याकांड होऊ शकते, अशी मला भीती वाटते.


अनेक परप्रांतीयांच्या जमिनी अडकल्या :उद्धव ठाकरे स्वतः या सर्व प्रकरणात लक्ष घालत आहेत. कदाचित मुंबईला या प्रकरणात लक्ष द्यावे लागेल. आम्हाला तिकडे जावे लागेल. या प्रकल्पाला स्थानिकांनी जनतेने विरोध केला आहे. आम्ही जनतेसोबत आहोत. जनता तुरुंगात जायला तयार आहे. जनता छातीवर गोळ्या घ्यायला तयार आहे. अशा वेळी शिवसेना स्वस्त बसणार नाही. शशिकांत वारीसे यांचा मृत्यू नसून ती हत्या आहे. आता सामुदायिक हत्याकांड तिथे होऊ शकते. कारण, त्या भागात महाराष्ट्राबाहेरच्या अनेक परप्रांतीयांना जमिनी घेतल्या आहेत. त्यांचे मोल कमी होईल. त्यांची गुंतवणूक अडचणीत येईल, म्हणून ही दडपशाही सुरू आहे. असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

हेही वाचा : Uday Samant On Refinery Project : कोकणात रिफायनरी प्रकल्प होणारच - उद्योग मंत्री उदय सामंत

ABOUT THE AUTHOR

...view details