मुंबई:ज्येष्ठ पटकथा लेखक कवी जावेद अख्तर ( Javed Akhtar Defamation ) यांनी अब्रूनुकसानीची याचिका दाखल केली आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर एका मुलाखतीत कंगनाने आपल्याविरोधात बिनबुडाचे आरोप करून नाहक बदनामी केली', अशी तक्रार जावेद अख्तर यांनी वकील जय भारद्वाज यांच्यामार्फत केली आहे.
याविषयी पोलिसांच्या अहवालाची दखल घेऊन न्यायालयाने कायदेशीर कार्यवाही सुरू केली. मात्र, वारंवार नोटीस देऊनही कंगना न्यायालयात हजर राहिली नव्हती. कंगनाने तिच्या आरोपात म्हटले होते, की जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलावले होते. या भेटीत त्यांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला की ऋतिक रोशन व त्याचे वडील ही मोठी माणसे असून जर तू त्यांची माफी मागितली नाही, तर ती माणसे तुला सोडणार नाहीत. तुला तुरुंगात पाठवतील व त्यानंतर होणाऱ्या परिणामांना तुझ्याशिवाय आणखी कोणी जबाबदार नसेल.