महाराष्ट्र

maharashtra

Savarkar Controversy : सावरकारांबाबत शिवसेनेनेची बोटचेपी भूमिका, भाजपचा काँग्रेसवर प्रहार

By

Published : Nov 18, 2022, 5:04 PM IST

राहुल गांधी यांच्याकडून महाराष्ट्रचा अपमान ( Insult of Maharashtra by Rahul Gandhi ) होत असल्याची टीका भाजप नेते आशिश शेलार ( BJP leader Ashish Shelar ) यांनी केली आहे. तसेच सावरकारांबाबत शिवसेनेने का बोटचेपी भूमिका घेतली असा सवाल देखील त्यांनी व्यक्त केला आहे. सावरकांराचा अपमान ( Rahul Gandhi insulted Savarkar ) सहन करणार शिवसेना करणार का? ( What is Shiv Sena position regarding Savarkar? ) असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Savarkar Controversy
भाजपचा काँग्रेसवर प्रहार

मुंबई -राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जाणूनबुजून अपमान ( Savarkar insulted by Rahul Gandhi ) करत आहेत. तो सावरकरांचा ( Rahul Gandhi insulted Savarkar ) देशभक्त भारतीयांचा अपमान आहे. ज्या महाराष्ट्रात या सुपुत्राचा जन्म झाला त्या महाराष्ट्राचा अपमान राहुल गांधी करत आहेत. मात्र असे असतानाही शिवसेना या संदर्भात बोटचेपी ( What is Shiv Sena position regarding Savarkar? ) भूमिका घेत आहे. असा आरोप भाजपा मुंबई प्रदेश अध्यक्ष शेलार ( BJP Mumbai Region President Shelar ) यांनी केला आहे. एक मराठी माणूस ज्याने भारताच्या स्वातंत्र्यासाठी काळ्यापाण्याची सजा भोगली. ते झुकला नाही. त्या सावरकरांचा अपमान म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे., अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी मुंबई पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

भाजपचा काँग्रेसवर प्रहार

राहुल गांधी यांनी महाराष्ट्राचा केला अपमान-सावरकरांच्या बाबतीत अपमानास्पद जेवढे काही करता येईल तेवढे काँग्रेसने केले आहे. केवळ कालचं विधान नाही तर स्वातंत्र्यवीर सावरकर इंग्रजांचे नोकर होते हे बदनामीकारक आहे पण त्याहीपेक्षा भयंकर काँग्रेसच्या अधिकृत मासिकामध्ये काही वर्षांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर हे समलैंगिक होते असा आरोप काँग्रेसने केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या निष्ठा, श्रद्धा आणि देशप्रेम याच्यावर जेवढे आक्रमण करता येईल तेवढे काँग्रेसने केले आहे. राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जाणूनबुजून अपमान करत आहेत. तो सावरकरांचा आणि देशभक्त भारतीयांचा अपमान आहे. ज्या महाराष्ट्रात या सुपुत्राचा जन्म झाला त्या महाराष्ट्राचा अपमान राहुल गांधी करत आहेत. एक मराठी माणूस ज्याने भारताच्या स्वातंत्र्यासाठी काळ्यापाण्याची सजा भोगली. त्या सावरकरांचा अपमान म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान म्हणजे मराठी माणसाचा अपमान काँगेस करते आहे असा आरोप यावेळी शेलार यांनी केला.

शिवसेनाची बोटचेपी भूमिका- शिवसेना सत्तेसाठी माती खात आहे. बोटचेपी भूमिका घेत आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मणीशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला कानशिलात जोडे मारले आणि भारत जोडो अभियानामध्ये आदित्य ठाकरे झप्पी मारत आहेत. आता आदित्य ठाकरे गप्प का आहेत? आदित्य ठाकरे राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध का करत नाहीत? विपर्यासाचे राजकारण शिवसेना उद्धव ठाकरे गट करत आहे. इतिहास, मराठी माणूस, महाराष्ट्र त्यांना कदापि माफ करणार नाही. या देशातील कोणताही देशभक्त नागरिक शिवसेना उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना माफ करणार नाही. महाराष्ट्राच्या अपमानाबाबत जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. असेही शेलार यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details