कोल्हापूर : दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार विनायक पाटील आणि बाबासाहेब मोरे दोघेही नेहमीच एकत्र पाहायला मिळायचे. दुचाकी गाडीवर अनेकदा गावकऱ्यांना दिसायचे. यातील विनायक याचा चिरा-दगड पुरविण्याचा व्यवसाय होता, तर बाबासाहेब मोरे याचा जनावरांचा गोठा होता. अनेकदा ते एकत्रच पाहायला मिळायचे. त्यांच्या भागातील लोक त्यांना जय-विरूची जोडी बोलायचे. मात्र, दोघांनी जगाचा निरोप घ्यायचा निर्णय घेत एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. आज सोमवारी दुपारी येथील तात्यासाहेब कोरे मिलीटरी हायस्कूल परिसरात एका झाडाला गळफास लावल्याचे उघड झाले.
दोघांच्याही डोक्यावर कर्जाचा मोठा डोंगर :दोघांच्याही डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने त्यांनी हा आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. या घटनेची वडगाव पोलिसांत नोंद झाली आहे. विनायक पाटील यांच्या पाश्चात आई, मुलगा, पत्नी आणि केवळ 10 दिवसांची मुलगी आहे, तर आणि बाबासाहेब मोरे यांच्या पश्चात्य आई, वडील, पत्नी, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. विनायक शिवाजी पाटील (वय 40) आणि बाबासाहेब हिंदुराव मोरे (वय 41) असे या दोघां जिवलग मित्रांचे नाव आहे.
कोल्हापूर हादरले :कोल्हापुरातील हातकंणगले तालुक्यातील पारगाव येथील घटनेने कोल्हापूर शहर हादरले आहे. प्रगत जिल्हा म्हणून ओळखले जाणारे कोल्हापूर आता आत्महत्येचे केंद्र बनत चालले आहे. कोल्हापुरात आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाही. कर्जाच्या कारणाने या दोघांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. दोघांचाही चांगला व्यवसाय चालू असताना, त्यांनी घेतलेल्या कर्जाची घरच्यांना अधिक माहिती नव्हती. परंतु, परिसरात याची चर्चा असायची. दोघेही खास मित्र म्हणून परिसरात ओळखले जायचे.