बीड :बीडचे मूळ नाव चंपावती नगर होते. मुहम्मद बिन तुघलकने देवगिरीवर स्वारी केल्यानंतर हा भाग त्याच्या राज्यात समाविष्ट झाला. त्यानंतर त्यांनी चंपावती हे नाव बदलून पारशी नाव भिर ठेवले आणि भीरचे अपभ्रंश बीड केले. भीर म्हणजे पाण्याचा प्रदेश. बीड शहराजवळ 1572 च्या सुमारास बांधलेली एक भव्य पाण्याची रचना आहे. खजाना विहार शहराच्या दक्षिणेस पाच किलोमीटर अंतरावर आहे. या विहिरीचा व्यास सुमारे 50 फूट आहे, तर खोली 23.5 मीटर आहे. जमिनीपासून १७ फूट अंतरावर असलेल्या या विहिरीला गोलाकार ओरंडा देखील आहे ज्यावर सहज चालता येते. त्या ओसरीखाली सहा फूट विहीर आहे. या विहिरीतील पाणी नेहमीच किमान चार फूट असते. गेल्या शतकात या विहिरीचे पाणी पावसाळ्यात वाढले नाही, किंवा उन्हाळ्यात आटले नाही.
खजाना विहीर :बीड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी विहिरीमध्ये कालवा बांधलेला आहे. या कालव्याद्वारे बीड शहरातील बलगुजर भागात पाणी आणण्यात आले असून, या भागातील 450 एकर शेती कुठलेही उपकरण न वापरता विहिरीच्या पाण्यामुळे सिंचनाखाली आहे. या विहिरीचे बांधकाम स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना मानला जातो. विहिरीच्या आतील बाजूस उर्दू भाषेतील शिलालेख आहे. या विहिरीला तीन कालवे आहेत. यातील एक नैऋत्य, दुसरा अग्नेय तर तिसरा उत्तर दिशेला आहे. कधीही न आटणाऱ्या या खजाना विहिरीच्या बांधकामासाठी चूना आणि दगडाचा वापर केलेला असून, ही विहीर मलिक अंबर यांच्या काळात बांधलेली असावी, असा अंदाज आहे. मध्ययुगीन काळात या परिसरातील गोळा होणारा पैसा राजाला दिला जात असे. मात्र या विहिरीचे बांधकाम केल्यामुळे पैसा खर्च झाला त्यामुळे या विहिरीला खजाना विहीर असे नाव पडले आहे. सध्या बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईची समस्या तीव्र झाल्यामुळे शेकडो फूट खोल विहिरी आणि बोअरवेल घेतल्या जातात. मात्र पाण्याचा असा कायम स्त्रोत क्वचितच सापडतो. अशा परिस्थितीत बीडमधील कधीही न आटणारी खजाना विहिर ही संशोधकांसाठी अभ्यासाचा विषय ठरला आहे.
काय म्हणतात या ठिकाणचे नागरिक :खजाना विहिरीचे बांधकाम 1572 मध्ये झालेली आहे. हे बांधकाम निजाम कालीन आहे. शास्त्रीय दृष्टीकोनातून स्थापत्य शास्त्रामधील एक कलेचा नमुना आहे, जलस्रोता पैकी एक अतिशय महत्त्वाचा नमुना आहे. यामध्ये पाण्याची लेवल आहे ती येणारे पाणी आणि जाणारे पाणी, अशा प्रकारचा त्याचा मेंटेनन्स केलेला आहे.