महाराष्ट्र

maharashtra

Hardik Patel in Ahmednagar : गुजराथ मॉडेल फेल झालेय - हार्दिक पटेलांची टीका

By

Published : Dec 18, 2021, 12:03 PM IST

कर्जतला प्रचारसभेच्यानिमित्ताने आलेले गुजरात प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल (Gujarat Congress President Hardik Patel) यांनी गुजराथ मॉडेल फेल (Failed Gujrat Model) गेल्याची टीका केली. यावेळेस रोहित पवार (Rohit Pawar) हे सुध्दा उपस्थित होते.

Hardik PateL
Hardik PateL

अहमदनगर -राज्यात 105 नगर पंचायतींची निवडणूक होत असून या निमित्ताने सध्या प्रचारसभा सुरू आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत, पारनेर, अकोले आणि शिर्डी या नगर पंचायतींचा (Nagar Panchayat Election) यात समावेश आहे. कर्जतला प्रचारसभेच्यानिमित्ताने आलेले गुजरात प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल (Gujarat Congress President Hardik Patel) आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhanjanay Munde) हे उपस्थित होते. यावेळेस त्यांनी विरोधात असलेल्या भाजपवर जोरदार निशाणा साधला.

हार्दिक पटेलांची टीका
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या जामखेड-कर्जत मतदारसंघात लक्ष ठेवत कर्जत नगरपंचायतची निवडणूक लक्षवेधी केली आहे. एकूण सतरापैकी ओबीसी आरक्षित चार जागा वगळून 13 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यात एका प्रभागात भाजपच्या उमेदवाराने उमेदवारी मागे घेत राष्ट्रवादीचा उमेदवार बिनविरोध निवडून आणला आहे. रोहित इथेच थांबले नाहीत तर शुक्रवारी रात्री झालेल्या सभेत भाजपच्या अजून दोन उमेवरांनी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देत गळ्यात राष्ट्रवादीचा पंचा धारण केला. माजी मंत्री राम शिंदेंना हा मोठा धक्का आहे.

हार्दिक पटेलांची भाजपवर टीका
शुक्रवारी झालेल्या सभेत गुजरात प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी आपल्या खास भाषण शैलीत भाजपवर (Hardik Patel criticize on BJP) टीका केली. 2014 पासून दिल्लीत दोन-तीन गुजराथी बसले असून देशभर गुजरात विकासाचे मॉडेलाची विकासकथा (Gujrat Development Model) सांगत आहे. मात्र, हे सर्व खोटे असून पाच हजारावर शेतकऱ्यांनी गुजरातमध्ये आत्महत्या केल्या आहेत. तर पाच लाख युवक बेरोजगार आहेत. कुठे गेल्या दोन कोटी नोकऱ्या असा सवाल करत मोदींचे गुजरात मॉडेल फेल गेल्याचे पटेल यांनी सांगितले. गुजरातची खरी ओळख ही महात्मा गांधी आणि सरदार वल्लभ पटेल आहे. आणि तीच कायम राहील असे सांगत मोदी - शहांवर निशाणा साधला.

हार्दिक पटेल अहमदनगरध्ये
राज्य निवडणूक आयोग झाला केंद्राची संस्था
आपल्या भाषणात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्याची विनंती न ऐकता निवडून कायम करणाऱ्या राज्य निवडणूक आयोगावर टीका केली. ओबीसी जागा खुल्या वर्गातून भरल्या जाणार आहेत. मात्र, याचे पाप भाजपच्या काळात झाल्याचे सांगत मुंडे यांनी केंद्राने इम्पिरीकल डेटा न दिल्याने झालेल्या अन्यायास भाजप जबाबदार असल्याचा आरोप केला. राज्य निवडणूक आयोगाने पण यावर राज्य सरकारची विनंती न ऐकता निवडणूक घोषित केली. आता ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय सोबत पण निवडणूक आयोग पण केंद्राची संस्था झाल्याचा गंभीर आरोप केला. सभेस राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार, पदाधिकारी, आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मोठी गर्दी जमवत ही सभा पार पडली. रोहित पवार यांनी आपण जे दोन वर्षात केले ते राम शिंदेंना दोन टर्म मध्ये जमले नाही असे सांगत टीका केली. आणि समोरासमोर या तुमचा आणि माझा हिशोब काढू असे खुले आव्हान दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details