चटगाव : पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी नाबाद फलंदाज श्रेयस अय्यर आणि आर अश्विनने दुसऱ्या दिवशी ( First Test Match Second Day ) डाव पुढे सरकवण्यास सुरुवात ( Shreyas and R Ashwin Unbeaten Batsmen of First Day ) केली आहे. सकाळच्या सत्रात ( Shreyas and R Ashwin Unbeaten Batsmen of First Day ) दोन्ही फलंदाज उत्तम फलंदाजी करीत आहेत. वृत्त लिहेपर्यंत भारतीय संघाने 98 षटकांत 7 गडी गमावून 293 धावा केल्या आहेत. कुलदीप यादव आणि आर अश्विन फलंदाजी करीत आहेत. श्रेयस अय्यर ८६ धावा करून इबादत हुसेनच्या गोलंदाजीवर बाद झाला. अशाप्रकारे त्याचे शतक हुकले.
भारताने केली दमदार सुरुवात :चेतेश्वर पुजारा (90) आणि युवा फलंदाज श्रेयस अय्यर (नाबाद 82) यांच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीच्या पहिल्या दिवशी बुधवारी 6 गडी गमावून 278 धावा केल्या. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने दमदार सुरुवात केली आणि सलामीच्या भागीदारीत 41 धावांची भर घातली. पण, त्यानंतर 48 धावांवर जात असताना भारताने तीन विकेट गमावल्या. भारताची चौथी विकेट 112 धावांवर पडली. मात्र, यानंतर पुजारा आणि अय्यर यांनी पाचव्या विकेटसाठी 149 धावांची मोठी भागीदारी केली. भारताने दिवसाच्या शेवटच्या षटकात पुजारा आणि अक्षर पटेल यांच्या विकेट्स गमावल्या आणि भारताची धावसंख्या सहा विकेट्सवर 278 अशी झाली.