महाराष्ट्र

maharashtra

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर आठवडाभरात दुसरा अपघात, क्वॉलिटी ऑडिट करण्याची बावनकुळेंची मागणी

By

Published : Apr 28, 2022, 7:29 PM IST

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या ( Balasaheb Thackeray Samruddhi Highway Accident ) बांधकाम स्थळी आठवड्याभरात दुसऱ्यांदा मोठा अपघात झाला आहे. त्यामुळे महामार्गाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत ( Samruddhi Highway Contruction Quality ) प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत, असा आरोप भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule demands quality audit ) यांनी केला आहे.

Samruddhi Highway Accident
Samruddhi Highway Accident

नागपूर -हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या ( Balasaheb Thackeray Samruddhi Highway Accident ) बांधकाम स्थळी आठवड्याभरात दुसऱ्यांदा मोठा अपघात झाला आहे. त्यामुळे महामार्गाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत ( Samruddhi Highway Contruction Quality ) प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. गेल्या दोन वर्षात समृद्धी महामार्गाच्या कामाकडे राज्य सरकारने पूर्णतः दुर्लक्ष केले असल्याने बांधकामाचा दर्जा घसरला आहे. त्यामुळे बांधकामाचे क्वॉलिटी ऑडिट व्हावे, अशी मागणी राज्याचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस नियमित आढावा घ्यायचे -तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाच्या बांधकामाचा दर्जा महाविकास आघाडी सरकारच्या काळात घसरल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या बांधकामाची गुणवत्ता राज्य सरकारने तत्काळ तपासावी. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात समृद्धीच्या निर्माण कार्याचा आढावा घेण्यासाठी आठवड्यातून एकदा बैठक होत होती. या बैठकीला स्वतः देवेंद्र फडणवीस उपस्थित राहून बारीकसारीक गोष्टींच्या गुणवत्तेची शहानिशा करायचे, असेही बावनकुळे म्हणाले.

गुणवत्तेकडे साफ दुर्लक्ष -२०१९ साली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. मात्र, त्यानंतर राज्य सरकारने समृद्धीच्या बांधकामाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. त्यानंतर बांधकामाचा आढावा घेणाऱ्या बैठकीही झाल्या नाहीत. त्यामुळे समृद्धी महामार्गाचे क्वॉलिटी ऑडिट गरजेचे आहे. अपघात होत आहेत, याचाच अर्थ बांधकामात हयगय झाल्याचे जाणवते आहे. हा महामार्ग नियोजित आराखड्यानुसार बांधण्यात आला का? त्याचा डीपीआर होता त्यानुसार बांधकाम झाले का? याची तपासणी करण्याची आवश्यकता असल्याचे बावनकुळे म्हणाले आहेत.

अति घाई संकटात नेई -राज्य सरकार श्रेय लाटण्याच्या नादात उदघाटनाची घाई करते आहे. मुळात राज्य सरकारकडे अजून अडीच वर्ष असताना सरकारला घाई करायला नको. आधी समृद्धी महामार्ग पूर्ण तयार होऊ द्या आणि नंतरच उदघाटन करा, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

हेही वाचा -MP Navneet Rana : घरचे जेवण मिळावे यासाठी नवनीत राणा आणि रवी राणा यांचा न्यायालयाकडे अर्ज

ABOUT THE AUTHOR

...view details