महाराष्ट्र

maharashtra

देशभक्ती शिकवायची गरज नाही, देशभक्ती काँग्रेसच्या रक्तात, नाना पटोलेंचा उपमुख्यमंत्र्यांना टोला

By

Published : Aug 17, 2022, 12:59 PM IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रगीतावरून काँग्रेसवर टीका केली होती. त्यालाही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिले. नाना पटोले म्हणाले, की काँग्रेसला देशभक्ती शिकवायची गरज नाही. केंद्राची महासत्ता त्याच्या पाठीशी आहे. महाशक्ती कशी वागते, त्याचा परिणाम मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या आमदारांवर झाला आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. Nana Patole slammed BJP

Nana Patole on MLA Santosh Bangar
नाना पटोलेंचा उपमुख्यमंत्र्यांना टोला

मुंबईपावसाळी अधिवेशनानिमित्त राजकीय वातावरण तापले Monsoon session 2022 आहे.आमदार संतोष बांगर यांनी यांनी औद्योगिक वसाहतीमध्ये जाऊन व्यवस्थापकाच्या खानाखाली लगावली. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली Nana Patole Slammed Santosh Bangar आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole slammed BJP म्हणाले, की केंद्राची महासत्ता त्याच्या पाठीशी आहे. महाशक्ती कशी वागते, त्याचा परिणाम मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या आमदारांवर झाला आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. या प्रकारच्या वक्तव्याला जनता माफ करणार नाही. त्यांना त्यांची जागा बघायला मिळेल, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. आमदार संतोष बांगर यांनी मारहाण केलेला व्हिडिओ समोर आला आहे.

काय घडले होतेशिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे नेहमीच या ना त्या MLA santosh Bangar slap manager in hingoli कारणाने चर्चेत राहतात. आता तर त्यांनी ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे लक्ष घातले आहे. जिल्हाभरात बांधमक कामगारांना दिल्या जाणारे निकृष्ट दर्जाचे भोजन, त्यात खराब झालेल्या पोळ्या, बुरशी आलेला भात, वरण पाहून आमदार संतोष बांगर हे चांगलेच संतापले. बांगर यांनी औद्योगिक वसाहतीमध्ये जाऊन व्यवस्थापकाला विचारणा याबाबत विचारणा केली. त्यावर व्यवस्थापक उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने बांगर यांनी त्याच्या खानाखाली लगावली. याचा व्हिडिओ सोशल मोडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

काँग्रेसला देशभक्ती शिकवायची गरज नाहीउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रगीतावरून काँग्रेसवर टीका केली होती. त्यालाही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिले. नाना पटोले म्हणाले, की काँग्रेसला देशभक्ती शिकवायची गरज नाही. देशभक्ती काँग्रेसच्या रक्तात आहे. ज्यांच्याकडे ते नाही ते नेहमीच अशी विधाने करून मुख्य मुद्द्यापासून दूर जातात. राष्ट्रगीताला विरोध करण्याचे कारण नाही, असेही नाना पटोले यांनी म्हटले.

हेही वाचा Maharashtra Monsoon Assembly Session हे गद्दार सरकार आहे ते कोसळणार म्हणजे कोसळणारच आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details