मुंबई - राज्यात डिसेंबर महिन्यापासून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ (Corona Cases Hike) होत आहे. ही वाढ अशीच सुरू राहून जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून (January 3rd week) तिसऱ्या लाटेचा परिणाम (Corona Third Wave) पाहायला मिळेल. तिसऱ्या लाटेत बाधित रुग्णांची संख्या ८० लाखांपर्यंत जाऊ शकते, तर मृत्यूचा आकडा ८० हजारांपर्यंत पोहचेल, अशी शक्यता आरोग्य विभागाचे अप्पर सचिव डॉ. प्रदीप व्यास (Dr. Pradeep Vyas) यांनी व्यक्त केली आहे. तसेच सक्रिय रुग्णांची संख्या २ लाखांच्या वर पोहचेल, असा अंदाज राज्याच्या आरोग्य विभागाकडून (State Health Department) वर्तवण्यात आला आहे.
- उपाययोजना करा -
राज्यात गेले पावणे दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार सुरु आहे. या प्रसारादरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. या दोन्ही लाटा थोपवण्यात राज्य सरकारला यश आले आहे. मात्र जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रसार झाला आहे. डिसेंबर महिन्यात राज्यातील कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. हा प्रसार रोखण्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. प्रदीप व्यास यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे सीईओ यांना पत्र लिहून कोरोना रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत सूचित केले. त्यांनी कोरोनाच्या संकटाची जाणीव या पत्राद्वारे या अधिकार्यांना करून दिली आहे. कोरोनाची लक्षणे सौम्य आढळत आहे, रुग्णालयीन रुग्णसंख्या कमी आहे या भरोशावर राहू नका. वैज्ञानिकदृष्ट्या विचार करून उपाययोजना करा असे निर्देश दिले आहेत.
- मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढणार -