"400 पार म्हणणारे 200 चा आकडा तरी गाठतील का?", अमोल कोल्हेंचा खोचक सवाल - Lok Sabha Elections

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 23, 2024, 9:43 PM IST

thumbnail

पुणे Amol Kolhe Criticized BJP : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं असताना सर्व राजकीय पक्षांनी लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. असं असतानाच राज्यात महायुतीच्या सरकारनं आपला नवा भिडू राज ठाकरे यांना सोबत घेण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान, याविषयी प्रतिक्रिया देत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, "महायुतीत सहभागी होणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण यापद्धतीनं जे प्रकार सुरु आहेत, त्यामध्ये भाजपाचा कॉन्फिडन्स खचलेला दिसतोय. अब की बार 400 पार म्हणणारे जेमतेम ते 200 चा आकडा गाठू शकतील का? हे सांगणं कठीण आहे. तसंच महाराष्ट्र हा कायम विचारांच्या मागं उभा राहिलाय, महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा येत्या निवडणुकीत नक्की दिसेल", असं कोल्हे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.