ETV Bharat / state

सरकारनं ओबीसी समाजाला दिलेला शब्द पाळला, आम्ही समाधानी : बबनराव तायवाडे

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 27, 2024, 1:44 PM IST

Updated : Jan 27, 2024, 2:11 PM IST

बबनराव तायवाडे
बबनराव तायवाडे

OBC Leader Babanrao Taywade : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या आहेत. यावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सरकारचं कौतुक केलंय.

बबनराव तायवाडे, अध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ

नागपूर OBC Leader Babanrao Taywade : राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचं जाहीर केलंय. त्यानंतर मनोज जरांगेंनी मुंबईच्या दिशेनं निघालेलं आंदोलन मागं घेत असल्याचं जाहीर केलंय. यावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले "सरकारनं त्यांच्या मागण्या पूर्ण केल्यात असं त्यांना वाटत असेल, त्यांचं समाधान झालं असेल आणि त्यांनी आंदोलन मागं घेतलं असेल, तर मी त्यांच अभिनंदन करतो." तसंच सरकारनं मराठा समाजाला समाधानी केलं, त्याबद्दल सरकारचंही त्यांनी अभिनंदन केलंय.

राजपत्रात नवीन काही नाही : सरकारनं आज काढलेल्या अधिसूचनेबाबत बोलताना बबनराव तायवाडे म्हणाले की, "इथं महत्त्वाचा प्रश्न आहे की, कालपर्यंत सगे सोयऱ्यांच्या बद्दल जे काही बोलल्या जात होतं, त्यासंदर्भात मी बोलताना सांगितलं होतं की सगे सोयरे म्हणजे काय तर वडील, आजोबा आणि पंजोबा यांच्या शैक्षणिक आणि महसुली कागदपत्रावर जी जात दिलेली असेल, ती त्यांच्या मुलांना आणि नातवंडांना लागू असते. तेच या राजपत्रात दिलेलं आहे. नवीन काय दिलेलं नाही, त्यामुळं आमच्या आरक्षणाला कुठंही धक्का लागलेला नाही."

राजपत्राचा समाज अभ्यास करेल : "राज्य सरकारनं दिलेल्या राजपत्राचा समाज हा पूर्ण अभ्यास करेल, त्यानंतर काय मिळालं आणि काय नाही, हे ठरवले जाईल, असं बबनराव तायवाडे म्हणाले. आमच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण झालेला नाही. राज्य सरकारनं आमच्याशी धोका केलेला नाही. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही. मराठा समाजाला सरसकट ओबीसीमध्ये आरक्षण दिलेलं नाही. त्यामुळं आमची मुंबईला जाण्याची गरज नाही, आम्ही समाधानी आहोत. सरकारचे आभार मानतो," असंही बबनराव तायवाडे म्हणाले.

हेही वाचा :

  1. मराठ्यांचा ऐतिहासिक विजय! आरक्षणाची अंमलबजावणी होईपर्यंत सर्वांना ओबीसींच्या सुविधा मिळणार; मुख्यमंत्र्यांची घेषणा
  2. जरांगेंच्या मागण्यांवर सरकारनं काढला अध्यादेश, काय आहे अध्यादेशात; मध्यरात्री काय घडलं?
  3. जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य, अखेर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडलं उपोषण
Last Updated :Jan 27, 2024, 2:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.