ETV Bharat / state

देशातील सर्व घटकांना मदत करणारा सर्वसमावेश अर्थसंकल्प; छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 1, 2024, 5:23 PM IST

Chhagan Bhujbal : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (1फेब्रुवारी) सन 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावर महाराष्ट्र सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Chhagan Bhujbal
मंत्री छगन भुजबळ

प्रतिक्रिया देताना मंत्री छगन भुजबळ

नाशिक Chhagan Bhujbal : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सरकारमधील अंतरिम अर्थसंकल्प सादर केलाय. या अर्थसंकल्पात देशातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, महिला, तरुण, विद्यार्थी, उद्योजक यांच्यासह सर्वच घटकांचा विचार करून योजना आखली आहे. सर्व घटकांना मदत करणारा सर्वसमावेश अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिलीय.



महिलांना लखपती बनविण्यासाठी योजना : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सरकारमधील अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. याबाबत त्यांनी आज नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधला. देशातील अन्नाच्या समस्या दूर करत देशातील सुमारे ८० कोटी नागरिकांना मोफत अन्न, धान्य उपलब्ध करून देण्याबाबत घोषणा करण्यात आली असून त्याची अंमलबजावणीदेखील सुरु आहे. देशातील गोरगरीब नागरिकांसाठी २ कोटी घरे बांधण्यात येणार आहे. सौर ऊर्जा योजनेद्वारे १ कोटी घरांना ३०० युनिट पर्यंत वीज माफ करण्यात येणार आहे. पीएम आवास योजनेतील ७० टक्के घर ही महिलांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच संसदेत महिलांना आरक्षण देण्याबाबतही कार्यवाही करण्यात येत आहे. देशातील ३ कोटी महिलांना लखपती बनविण्यासाठी योजना आखल्या जात आहे, ही अतिशय महत्त्वपूर्ण बाब असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.



योजनांचा फायदा होतील : विशेषतः देशांतील बहुतांश राज्यांना समुद्र किनारा लाभला आहे. त्यादृष्टीने मत्स व्यवसायाला अधिक चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. देशातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीएम किसान योजना, पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ देण्यात येत आहे. शेतीसाठी आधुनिक साठवणूक केंद्र उभारण्यासह पुरवठा साखळीवर भर देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तेलबिया लागवडीला प्रोत्साहन देत दुध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतल्याने शेतकऱ्यांना या निर्णयांचा मोठा फायदा मिळणार असल्याचं भुजबळ म्हणाले.



संरक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूद : देशातील संरक्षण क्षेत्रासाठी देखील भरीव तरतूद करण्यात आली असून १ हजार फायटर विमाने निर्माण करण्यात येणार आहे. देशाअंतर्गत विमान सेवेला चालना देण्यासाठी ५०० पेक्षा जास्त विमानमार्ग विकसित करण्यात येणार आहे. शहरांमध्ये मेट्रो रेल्वेला चालना देत ४० हजार वंदे भारत कोच निर्मिती करण्यात येणार येऊन ३ मोठे रेल्वे कॉरीडॉर विकसित करण्यात येणार आहे. यामुळे देशाच्या विकासाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.



विद्यार्थ्यांना फायदा होणार : देशात १५ एम्स रुग्णालय विकसित करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण मिळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विकसित करण्यात येणार आहे. यामुळं रुग्णालयामध्ये देखील वाढ होऊन चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत आरोग्य सेवेला बळकटी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देण्यासाठी ३ हजार तंत्रशिक्षण महाविद्यालय सुरु करण्यात येणार असल्यानं विद्यार्थ्यांना याचा अधिक फायदा होणार आहे.



उद्योग क्षेत्रात महत्त्वाचे निर्णय : उद्योग क्षेत्रामध्ये फूड प्रोसिसिंग युनिटला अधिक चालना देण्याची घोषणा उल्लेखनीय आहे. पर्यटन वाढीसाठी विविध योजना आखल्या जात आहे. इलेक्ट्रॉनिक वाहनासाठी सवलत देण्यात आली आहे. तसेच २२ टक्के कॉर्पोरेट कर कमी करण्याच्या निर्णय उद्योग क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. सर्वसामान्य नागरिकांना ७ लाख रुपयांपर्यंत करसवल देण्यात आली असून केंद्र सरकारने सादर केलेला हा अर्थसंकल्प अंतरिम असला तरी सर्वसमावेश असा असल्याचं प्रशस्तीपत्रक छगन भुजबळ यांनी दिलं आहे.


हेही वाचा -

  1. ओबीसी आरक्षणाला भूकंप; मंत्री छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा - हरिभाऊ राठोड
  2. छगन भुजबळांना धक्का? 'महाराष्ट्र सदन' घोटाळा प्रकरणात मोठा ट्विस्ट
  3. ओबीसी मराठा आरक्षण वाद ; तर मराठा शिल्लक राहणार नाही, छगन भुजबळ यांचा पुन्हा हल्लाबोल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.