ETV Bharat / politics

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा वाद : 'भाजपाला सगळे पक्ष संपवायचे', शिंदे गटाच्या 'या' नेत्याचा भाजपावर हल्लाबोल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 2, 2024, 7:14 AM IST

Updated : Mar 2, 2024, 11:31 AM IST

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसंदर्भात नारायण राणेंच्या 'त्या' ट्विटवरुन रामदास कदमांची भाजपावर बोचरी टिका
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसंदर्भात नारायण राणेंच्या 'त्या' ट्विटवरुन रामदास कदमांची भाजपावर बोचरी टिका

Ramdas Kadam on BJP : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावरुन भाजपा नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 'आम्हीच ही जागा लढवणार,' असल्याचं 'X' सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलं होतं. त्यावरुन आता महायुतीत चांगलाच वाद निर्माण झालाय. या प्रकरणी शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपावर टीका केलीय.

रामदास कदम

रत्नागिरी Ramdas Kadam on BJP : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून राज्यातील लोकसभा मतदार संघावरुन विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये दावे-प्रतिदावे केले जात आहे. कोकणातल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावरुन भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्येच एकमेकांना प्रति आव्हानं दिली जात आहेत. आम्हीच ही जागा लढवणार असा दावा दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून केला जातोय. "ही जागा भाजपाची असून भाजपाच ही जागा लढवणार," असल्याचं पोस्ट केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते नारायण राणे यांनी 'X' सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केली होती. त्यांच्या या पोस्टनंतर शुक्रवारी शिवसेनेचे (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी भाजपावर बोचरी टीका केलीय.

रामदास कदमांचा भाजपावर निशाणा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या पोस्टवर शिवसेनेचे नेते रामदास कदम म्हणाले, "सर्व पक्ष संपवून फक्त भाजपाला एकट्यालाच जिवंत राहायचं आहे का? रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा शिवसेनेची आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ही जागा शिवसेना सोडणार नाही. तसंच आपण दोघं भाऊ भाऊ, तुझं आहे ते वाटून खाऊ आणि माझ्याला हात नको लावू," असा टोला रामदास कदम यांनी भाजपाला लगावलाय. त्यामुळे एकूणच या जागेवरुन वातावरण तापलं असून दोन्ही पक्षांचे पक्षश्रेष्ठी यावर कसा तोडगा काढतात, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

लोकसभेच्या जागेवरुन दावे-प्रतिदावे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाचं भिजत घोंगडं तसंच आहे. अनेक जागांवरुन महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्याच सहकारी पक्षाविरुद्ध मोर्चा उघडलाय. वरवर जरी सर्व आलबेल आसल्याचं दोन्ही दाखवत असले, तरी जागावाटप करताना वरिष्ठांना चांगलीच डोकोदुखी होणार हे मात्र निश्चित. आता दोन्हीही बाजुंनी जागावाटपावर काय तोडगा निघतो, हे येणाऱ्या काळात कळेलच.

हेही वाचा :

  1. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवर शिंदे गटाचा दावा..उदय सामंत यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी केलं मोठं वक्तव्य
  2. लोकसभेच्या तोंडावर नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, जाणून घ्या राजकीय अर्थ
  3. BJP leader Ashish Shelar in Ratnagiri रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 2024 मध्ये कमळच फुलेल : आशिष शेलार
Last Updated :Mar 2, 2024, 11:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.