ETV Bharat / entertainment

विलासराव देशमुख यांनी काँग्रेस सोडली होती?, सोशल मीडियावरील चर्चांना रितेश देशमुखचा एकाच वाक्यात रिप्लाय

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 19, 2024, 2:18 PM IST

Riteish Deshmukh
Riteish Deshmukh

Riteish Deshmukh : नुकतेच लातूरमध्ये बोलताना अभिनेता रितेश देशमुखनं, वडील विलासराव देशमुख यांच्या मनात काँग्रेस सोडण्याबद्दल कधीच विचार आला नव्हता, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर एका युजरनं, विलासराव देशमुख यांनी काँग्रेस सोडली होती, अशी प्रतिक्रिया दिली. यावर आता रितेशनं रिप्लाय दिला आहे.

लातूर Riteish Deshmukh : अभिनेता रितेश देशमुख कायमच प्रसिद्धीच्या झोतात असतो. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणारा रितेश अनेकदा चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना दिसतो. रविवारी (18 फेब्रुवारी) लातूर येथे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं. या सोहळ्याला संबोधित करताना रितेश देशमुखनं अनेक गोष्टींवर भाष्य केलं. यावेळी तो भावूक झाल्याचही पाहायला मिळालं.

यूजरची पोस्ट : सध्या काँग्रेस नेते आपला पक्ष सोडून अन्य पक्षात प्रवेश करण्याची मालिका सुरू आहे. यातच सोशल मीडियावर एका यूजरनं विलासराव देशमुख यांनी काँग्रेस सोडल्याचा तसेच त्यांनी शिवसेना आणि भाजपाच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून विधान परिषदेची निवडणूक लढवल्याचा दावा केला होता. यूजरनं लिहिलं, "विलासराव देशमुख काँग्रेसचे निष्ठावंत नेते होते. काँग्रेस सोडण्याचं त्यांच्या मनातही आलं नाही, असं रितेश देशमुखनं म्हटलं. पण, सत्य असं आहे की, विलासराव देशमुख यांनी काँग्रेस सोडली होती आणि विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना-भाजपाच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती."

रितेश देशमुखचा मोजक्याच शब्दात रिप्लाय : या पोस्टवर रितेश देशमुखनं मोजक्याच शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. रितेश देशमुख म्हणाला की, "हे असत्य आहे. कृपया जा आणि तथ्य तपासा." विलासराव देशमुख काँग्रेसचे निष्ठावंत नेते होते. काँग्रेस सोडण्याचं त्यांच्या मनातही आलं नाही, असं रितेशनं म्हटलं होतं.

वडिलांच्या आठवणीनं अश्रू अनावर : विलास कारखाना परिसरात आयोजित सोहळ्यात बोलताना रितेश देशमुखला वडिलांच्या आठवणीनं अश्रू अनावर झाले होते. भाषण संपलं त्यावेळी रितेशच्या आई वैशालीताई देशमुख यांचे डोळेही पाणावले होते. बाजूला बंधू माजी मंत्री अमित देशमुख यांनी रितेशच्या पाठीवर हात ठेवत धीर दिला. त्यावेळी आई वैशालीताई आणि काका दिलीपराव देशमुख यांच्यासह मंचावर आणि उपस्थित अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

हेही वाचा :

  1. नगरविकास खात्यासाठी एकनाथ शिंदे 'मातोश्री'वर येऊन रडले होते- आदित्य ठाकरेंचा दावा
  2. मातोश्रीच्या पायऱ्या कोण चढलं होतं?; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांसह अमित शाहांना सवाल
  3. "पंतप्रधान व्हायचं असेल तर राहुल गांधींनी भाजपामध्ये जावं'; आदित्य ठाकरेंचा सल्ला
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.