ETV Bharat / bharat

देशभरात मानव वन्यप्राणी संघर्ष शिगेला; वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जातो 'इतक्या' नागरिकांचा बळी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 9, 2024, 4:00 PM IST

Man Animal Conflicts : मानव वन्यप्राणी संघर्ष यामध्ये मोठी वाढ झाली आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये बंगाल टायगरच्या हल्ल्यात वर्षाला किमान 400 नागरिकांचा बळी जात असल्याचं विविध अहवालातून स्पष्ट झालं आहे. तर बिबट्याचे हल्ले महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तराखंडमध्ये वाढले आहेत. त्यासह हत्तीच्या हल्ल्यातही अनेक नागरिकांचा बळी जातो.

Man Animal Conflicts
मानव वन्यप्राणी संघर्ष शिगेला

हैदराबाद Man Animal Conflicts : देशात राज्याची संख्या वाढली असून लोकसंख्या झपाट्यानं वाढत आहे. मात्र जंगल परिसरात राहणाऱ्या अनेक नागरिकांनी मानव आणि वन्यजीव संघर्षात आपला जीव गमावला आहे. वाघ, हत्ती, आणि बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेक नागरिकांचा बळी गेला. त्यामुळं नागरिकांमध्ये जनजागृती करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातही चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, अमरावती या परिसरात मानव आणि वन्यजीव संघर्षात अनेक नागरिकांचा बळी गेला आहे.

Man Animal Conflicts
Man Animal Conflicts

का होतो मानव आणि वन्यजीव संघर्ष : जंगल परिसरात मानव आणि वन्यप्राणी संघर्ष मोठ्या प्रमाणात दिसून येतो. वन्य प्राणी आणि नागरिकांमध्ये संघर्ष का होतो, याबाबत अनेक विश्लेषक मतांतरं व्यक्त करतात. वन्य प्राण्यांच्या परिसरात मानवानं हस्तक्षेप केल्यानं हा संघर्ष शिगेला पोहोटला आहे. वन्य प्राण्यांच्या गरजा मानवी लोकसंख्येशी ओव्हरलॅप होतात, तेव्हा हा संघर्ष मानव आणि वन्य प्राणी या दोघांवरही परिणामकारक ठरतो.

Man Animal Conflicts
Man Animal Conflicts

देशात सध्या मानव वन्यप्राणी संघर्षाची वाढली प्रकरणं : मानवी वस्तीत शिरुन वन्यप्राण्यांनी हल्ला केल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष थांबवण्यासाठी देशाच्या धोरणात्मक गरजांमध्ये बदल करणं गरजेचं आहे. सध्या देशातील काही ठिकाणी मानव आणि वन्यप्राणी संघर्ष मोठ्या प्रमाणात होत आहे. यात मानव आणि वन्यप्राणी संघर्षाचे तीन विभागांमध्ये वर्गीकरण केलं जाऊ जाते. यात मानव आणि वाघ संघर्ष, मानव आणि बिबट्या संघर्ष आणि मानव आणि हत्ती संघर्ष असे तीन विभाग पडतात.

Man Animal Conflicts
Man Animal Conflicts

जगातील सगळ्यात मोठ्या खारफुटीत रक्तरंजित खेळ : बंगालमध्ये जगातील सगळ्यात मोठी खारफुटी बेटं आहेत. त्यात मानव आणि वन्यप्राणी संघर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकांचा बळी जातो. बंगाल टायगर हा जगप्रसिद्ध असून बंगालच्या परिसरात 500 बंगाल टायगर राहतात. हे बंगाल टायगर वर्षाला 50 ते 100 नागरिकांचा बळी घेतात. त्यामुळं बंगालच्या भूमिवर मानव आणि वन्यप्राण्यांच्या संघर्षात मोठा रक्तरंजित खेळ सुरू असल्याचं स्पष्ट होते.

हत्ती घेतात दरवर्षी 400 नागरिकांचा बळी : बंगालमधील वाघ नागरिकांचा बळी घेत असल्यानं जंगल परिसरातील नागरिक मोठ्या दहशतीत राहतात. मात्र मानव आणि वन्यप्राणी संघर्षात हत्तीही मागं नाहीत. दरवर्षी हत्ती आणि मानवात होणाऱ्या संघर्षात 400 नागरिकांचा बळी जातो. हत्तीच्या हल्ल्यात बळी पडणारे नागरिक हे गरीब घटकांमधील असल्याचा अहवाल विविध यंत्रणांनी दिला आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात जातो सर्वाधिक नागरिकांचा बळी : सध्या बिबट्याच्या मानवावरील हल्ल्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. मानव आणि वन्यप्राणी संघर्षात बिबट्याच्या हल्ल्यात सर्वाधिक मानवी हानी होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. बिबट्याचं प्रमाण पश्चिम पंगाल, महाराष्ट्र, तेलंगाणा, आसाम, उत्तराखंड या राज्यात कित्येक पटीनं वाढलं आहे. उत्तराखंडमधील जीम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे नरभक्षी बिबट्याचं सगळ्यात मोठं स्थान असल्याचं दिसून येते.

उत्तराखंडमध्ये 219 नागरिकांचा बळी : गेल्या तीन वर्षांत उत्तराखंड राज्यात तब्बल 219 मानवी मृत्यूची नोंद झाली आहे. याच कालावधीत राज्यात बिबट्यांच्या हल्ल्यात 1003 नागरिक जखमी झाले. 2021 मध्ये राज्यात 71 नागरिकांचे मृत्यू झाले. त्यानंतर ही संख्या 2022 मध्ये 82 पर्यंत वाढली. 2023 या वर्षात नागरिकांच्या मृत्यूत घट झाली असून या वर्षात राज्यात 66 मृत्यू झाले. 2021 मध्ये हत्तींच्या हल्ल्यात 13 नागरिकांच्या मृत्यूची नोंद झाली.

हेही वाचा :

  1. दुर्गापूर परिसरात मुक्तसंचार करणारा बिबट्या जेरबंद; आणखी एकाचा शोध सुरू
  2. चंद्रपुरात वाघांचं मृत्यूसत्र सुरुच; दीड महिन्यात तब्बल सात वाघांचा मृत्यू
  3. पिलीभीतमध्ये घराच्या भिंतीवर रात्रभर बसला वाघ, वनविभागाचे पथक दाखल तर शेतकऱ्यांवर दहशत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.