ETV Bharat / bharat

लोकसभा निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी 10 देशांचे नेते भारतात, बांगलादेशची अवामी लीग महत्त्वाची का? - Foreign Delegates In India

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 4, 2024, 5:34 PM IST

Foreign Delegates In India : भारतातील लोकसभा निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी सध्या १० देशातील प्रतिनिधी भारताच्या दौऱ्यावर आहेत. त्यामध्ये बांगलादेशच्या अवामी लीगचे प्रतिनिधी (Bangladesh Awami League) सुद्धा आहेत. 10 देशांतील 18 राजकीय पक्षांपैकी ते एक आहे. अवामी लीगच्या निमंत्रणाचं विशेष महत्त्व काय?, असा प्रश्न उपस्थित होतोय. याच पार्श्वभूमीवर आपण अवामी लीगचं भाजपासाठी आणि देशासाठी काय महत्त्व आहे, हे जाणून घेऊया, ईटीव्ही भारतचे अरुणिम भुयान यांनी घेतलेला आढावा.

Foreign Delegates In India
लोकसभा निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी 10 देशांचे नेते भारतात (Etv Bharat)

नवी दिल्ली Foreign Delegates In India : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी 10 देशांतील 18 राजकीय पक्षांचे नेते भारतात पोहोचलेत. मात्र, असं असतानाच परदेशी नेत्यांच्या शिष्टमंडळात बांगलादेशच्या अवामी लीगला (Bangladesh Awami League) आमंत्रित करण्याचं राजकीय महत्त्व काय?, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

भाजपाच्या निमंत्रणावरुन बांगलादेशातील सत्ताधारी अवामी लीग पक्षानं भारतात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकांचं निरीक्षण करण्यासाठी आपला प्रतिनिधी पाठवण्याचा निर्णय घेतलाय. मीडिया रिपोर्टनुसार, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी संसद सदस्य आणि अवामी लीगचे माहिती आणि संशोधन सचिव सलीम महमूद यांची लोकसभा निवडणुका पाहण्यासाठी 1 ते 5 मे दरम्यान भारत दौऱ्यावर येण्यासाठी निवड केली. या दौऱ्यात ते भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. राज्यातील भाजपाचा निवडणूक प्रचार पाहण्यासाठी त्यांना छत्तीसगडलाही नेण्यात येणार आहे. बांगलादेश हा 10 देशांपैकी एक आहे जिथून भाजपानं राजकीय पक्षांना सत्ताधारी भारतीय पक्षाच्या निवडणूक मोहिमेचं तसंच एकूण निवडणूक प्रक्रियेचं निरीक्षण करण्यासाठी आमंत्रित केलंय. 10 देशांतील 18 पक्षांच्या प्रतिनिधींनी बुधवारी भाजपाचे प्रमुख जे पी नड्डा आणि परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची पक्षाच्या मुख्यालयात भेट घेतली. यासंदर्भातील माहिती जे. पी. नड्डा यांनी एक्सवरुन दिली.

भाजपानं कोणकोणत्या राजकीय पक्षांना केलं आमंत्रित : भाजपाच्या परराष्ट्र विभागाचे प्रभारी विजय चौथाईवाले यांनी बुधवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, 10 देशांतील 18 राजकीय पक्षांचे प्रतिनिधी भाजपाच्या निवडणूक प्रचाराचा प्रत्यक्ष अनुभव आणि माहिती घेण्यासाठी भारतात आलेत. बांगलादेशच्या अवामी लीग व्यतिरिक्त आमंत्रित इतर देशांतील इतर पक्षांमध्ये ऑस्ट्रेलियातील लिबरल पार्टी, व्हिएतनामची कम्युनिस्ट पार्टी, इस्रायलची लिकुड पार्टी, युगांडाची नॅशनल रेझिस्टन्स मूव्हमेंट, टांझानियाची चामा चा मापिंडुझी, रशियाची युनायटेड रशिया पार्टी, श्रीलंकेची युनायटेड रशियन पार्टी, लंका पोदुजाना पेरामुना आणि युनायटेड नॅशनल पार्टी, नेपाळमधून नेपाळी काँग्रेस, जनमत पार्टी, नेपाळची कम्युनिस्ट पार्टी (युनिफाइड मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट), कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (माओवादी) आणि राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी याशिवाय मॉरिशसमधील लढाऊ समाजवादी चळवळ, मॉरिशस लेबर पार्टी, यांचा यामध्ये समावेश आहे.

अवामी लीगचं निमंत्रण महत्त्वाचं का : बांगलादेशमधील शैक्षणिक आणि सामाजिक कार्यकर्त्या, सध्या भारतातील KREA विद्यापीठात पोस्ट-डॉक्टरेट फेलोशिप घेत असलेल्या शरीन शाहजहान नाओमी यांनी ईटीव्ही भारतला सांगितलं की, भारताला बांगलादेशची आंतरराष्ट्रीय प्रतिमा चांगली असावी असं वाटतंय. या वर्षी जानेवारीत पार पडलेल्या बांगलादेशच्या संसदीय निवडणुकीत अवामी लीग पुन्हा सत्तेवर निवडून आली. त्या निवडणुकांपूर्वी, मुख्य विरोधी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) आणि इस्लामवादी शक्तींसह त्याच्या मित्रपक्षांनी अंतरिम सरकार स्थापन करण्याची मागणी केली होती. मात्र, शेख हसीना यांनी ही मागणी फेटाळून लावली. यानंतर अनेक विरोधी पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. बांगलादेशातील निवडणुकीपूर्वी अमेरिका आणि इतर पाश्चात्य शक्तींनीही निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बांगलादेशातील निवडणुका ही त्या देशाची अंतर्गत बाब असल्याचं सांगत भारतानं तटस्थ भूमिका घेतली.

शेख हसीना भारतात कधी येणार : सत्तेत परतल्यानंतर शेख हसीना भारताचे द्विपक्षीय यजमानपद भूषवणार आहेत. भारत देखील त्यांच्या यजमानपदासाठी इच्छुक असून परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा हे देखील लवकरच यासंदर्भात ढाका येथे जाणार आहेत. तर नाओमींच्या मते, भारताला बांगलादेशला आपला मित्र आणि भागीदार बनवायचंय. ही वृत्ती व्यापार संबंध, शिक्षण, मीडिया, वैज्ञानिक आणि तांत्रिक सहकार्यामध्ये दिसून येईल. तसंच गेल्या आठ वर्षांत अवामी लीग बांगलादेशातील सर्वात मोठा धर्मनिरपेक्ष पक्ष ठरलाय.

अवामी लीगनं धार्मिक उग्रवादाशी तडजोड केली नाही : 2016 मध्ये ढाका येथील होली आर्टिसन बेकरीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अवामी लीगनं धार्मिक अतिरेक आणि अतिरेक्यावर कोणतीही तडजोड केलेली नाही. इतर विरोधी पक्षांचा कल धार्मिक अतिरेकाकडं जास्त आहे, असंही नाओमीनं स्पष्ट केलं.

इतर परदेशी राजकीय पक्षांना निमंत्रित करण्याचं कारण काय? : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इस्रायली समकक्ष बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी जवळचे वैयक्तिक संबंध असून ते लिकुड पक्षाचे नेते देखील आहेत. त्यामुळं त्यांना देखील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी निमंत्रण देण्यात आलंय. त्याचप्रमाणे या वर्षाच्या सुरुवातीला रशियाच्या अध्यक्षपदी पुन्हा निवडून आलेले व्लादिमीर पुतीन हे युनायटेड रशिया पक्षाशी संबंधित आहेत. मात्र, पुतिन यांनी यंदाच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक स्वतंत्र कार्डावर जिंकली. पुतीन यांचेही मोदींशी जवळचे वैयक्तिक संबंध असल्यानं त्यांनाही निमंत्रीत करण्यात आलंय.

श्रीलंका आणि भारत यांच्यातील संबंध : श्रीलंकेच्या दोन प्रमुख राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे (पोदुजाना पेरामुना पक्ष) आणि विद्यमान अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे (युनायटेड नॅशनल पार्टी) हे देखील भारतात दाखल झाले आहेत. भारताच्या दक्षिण शेजारी देशात या वर्षाच्या अखेरीस राष्ट्रपती आणि संसदीय निवडणुका होणार आहेत. पश्चिम हिंदी महासागर क्षेत्रातील सागरी सुरक्षेच्या दृष्टीनं मॉरिशस भारतासाठी एक प्रमुख धोरणात्मक भागीदार म्हणून उदयास आलाय. या वर्षी फेब्रुवारीमध्ये, मोदी आणि त्यांचे मॉरिशियन समकक्ष प्रविंद जुगनाथ यांनी संयुक्तपणे सहा समुदाय विकास प्रकल्पांसह नवीन हवाई पट्टी आणि जेट्टीचं उद्घाटन केलं. प्रकल्पांच्या उद्घाटनाकडं भारत आणि मॉरिशस यांच्यातील मजबूत विकास भागीदारीचा पुरावा म्हणून पाहिले जात असलं तरी, खरा मुद्दा हा आहे की नवी दिल्लीला आता पश्चिम हिंदी महासागर क्षेत्रात एक सामरिक सागरी गड मिळालाय.

नेपाळ भारत संबंध : या वर्षी मार्चमध्ये नेपाळमध्ये नवीन कम्युनिस्ट युती सत्तेवर आलीय. काठमांडूमध्ये नवीन सरकारला आकर्षित करण्यात चीन सक्रियपणे गुंतलाय. तर हिमालयीन राष्ट्रात चीनच्या प्रभावाविषयी भारताच्या चिंतेबाबत नेपाळही संवेदनशील आहे. भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास त्या देशातील विविध विचारसरणीच्या पक्षांना निमंत्रित करुन द्विपक्षीय संबंध टिकवून ठेवण्यास मोठी मदत मिळेल. युगांडा आणि टांझानियन पक्षांचं निमंत्रण हे जगाचा आवाज म्हणून भारताच्या स्थानाचं अजून एक प्रतिबिंब आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, G20 चे अध्यक्ष म्हणून भारत आफ्रिकन युनियनमध्ये आंतर-सरकारी संघटनेत सामील झाला. तसंच भारत हा आफ्रिकन देश, बांगलादेश, मॉरिशस, नेपाळ आणि श्रीलंका या देशांना विकास सहाय्य करणारा प्रमुख भागीदार आहे.

हेही वाचा -

  1. वस्तू तसंच सेवा करात वाढ, जीएसटीतून 2.1 कोटींचा निधी जमा - goods and services tax
  2. 1 रुपयाच्या पेनी ड्रॉप व्हेरिफिकेशननं ऑनलाइन फसवणूक टळणार? जाणून घ्या प्रक्रिया - Penny Drop Verification
  3. चीनमध्ये स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्सची पुनर्रचना : जाणून घ्या काय आहे शी जिनपींग यांची मुत्सद्देगिरी - Chinese Restructuring
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.