मुंबई : आजपासून शाळा सुरु; चेंबूर येथील शाळेतून 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला आढावा
मुंबई - गेल्या दीड वर्षापासून बंद असणाऱ्या शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने शाळा प्रशासनाने सर्व प्रकारची तयारी केलेली होती. गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या शाळा सुरू होत असल्यामुळे आनंदाचे वातावरण दिसून आले. सरकारच्यावतीने दिलेल्या नियमाचे पालन करून शाळा सुरू केल्या जात आहे. यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'ने चेंबूर येथील शाळेतून घेतलेला आढावा.