शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा मध्य प्रदेश सरकारचा प्रयत्न; राज्यमंत्री बच्चू कडूंचा आरोप
बैतुल (मध्य प्रदेश) - केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो शेतकऱ्यांसोबत राज्यमंत्री बच्चू कडू दिल्लीला निघाले आहेत. त्यांच्या मोर्चाला मध्य प्रदेशमधील भाजप सरकारकडून दुसऱ्याच दिवशी बैतुलमध्ये आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप बच्चू कडू यांनी 'ई टीव्ही भारत'सोबत बोलताना केला आहे.